सांगोला प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी, कष्टकरी,कामगार,दलीत व महिलांच्या प्रश्नांसाठी सतत काम करणारा पक्ष आहे...
शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा ही पुरोगामी विचारधारा असुन.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहु महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व इतर सर्व राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे... शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हे पुरोगामी विचारधारा मानणारे कार्यकर्ते आहेत..ते विचारांशी कायम बांधील असतात..
सत्ता असो या नसो ते पक्ष ,संघटना ,विचारधारा यांच्याशी कायम जोडलेले असतात.. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची सर्व सामांन्याशी नाळ जोडलेली आहे.कारण जनमानसात सुध्दा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एक वेगळेच स्थान आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जो विचारधारेने पक्षाचे काम करीत असतो तो कार्यकर्ता पक्षाशी व संघटनेशी कधीही प्रतारणा करीत नाही.शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पक्ष बदलण्याचा विचार येत नाही... शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हे नेते व पक्षातील व्यक्ती यांच्या कामावरती विश्वास ठेवतात..परंतु पक्षामध्ये व्यक्ती केंद्रीत असण्याला थारा नाही...प्रथम पक्ष पक्षाची विचारधारा व त्यांच्या आधारे समाजाचा सर्वांगीण विकास...
विचारधारेच्या आधारावर पक्ष व पक्षातील कार्यकर्ते हे आपोआपच प्रशीक्षीत होत असतात..त्यांना समाजाच्या हिताच्या सर्व बाबींची सतत जाणीव असते..आशा कार्यकर्त्यांना नेते कोणी आहेत ते कोणत्या समुहाचे आहेत कोणत्या जातीचे आहेत याचे काहीही देणे नसते कारण ते पक्षाच्या विचारधारेशी जोडलेले असतात..म्हणुन आजही राज्याच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार खासदारांची संख्या इतरांच्या मानाने कमी असली तरीही ... विश्वासहर्ता...पक्षाशी एकनिष्ठता...याचा विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची एकनिष्ठता व विश्वासाहर्ता ही सर्वात वरच्या स्थानावरती आहे...कारण आमचे नेते कार्यकर्ते पक्षाच्या विचारधारेशी जोडलेले व बांधील रहातात...ते व्यक्ती पेक्षा पक्षाच्या विचारधारेला महत्व देतात.
स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब हे भाषणात सतत सांगायचे हे काम शेतकरी कामगार पक्षाने कार्यकर्त्यांच्या जिवावर केले..मी केले आहे ते कधीही म्हणत नसत...हा विचारधारेशी जोडल्याचा परीणाम आहे.बाकी नेते मी केले..मी केले आहे म्हणत आसतात...आशा विचारधारेमुळेच पक्षाची विश्वासहर्ता टिकुन असल्याचे मत प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले.