मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
जॉय सामाजिक संस्था मुंबई ही महाराष्ट्रतील सामाजिक कार्य करणारी अग्रगण्य संस्था असून दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असतात. लॉकडाऊन काळातही संस्थेने पुढाकार घेऊन अनेक गोरगरीब, वंचित, रोजगारीवर काम करणारे मजूर, आदिवासी विधर्थी, यांना मदत पोहचवली.यासाठी संस्थेचा अनेकांनी गौरव केला आहे.
या संस्थेच्या वतीने १५ जानेवारीला दादर मुंबई येथील आरजू सभगृहत जॉय संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे उपमहापौर बाबूभाई भवानजी, कामगार नेते अविनाश दौंड, दैनिक आपलं महानगर चे संपादक संजय सावंत, शिक्षक नेते जनार्दन जंगले, दैनिक मुंबई मित्र च्या संपादिका अनघा राणे आदी प्रमुख पामुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी काही निवडक पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार आणि जॉय चे देणगीदार व सभासदांना देखील कर्तव्यदक्ष कार्यकर्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जॉय चे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले.