पंढरपूर सिंहगड मध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा
पंढरपूर प्रतिनिधी
शेती हाच जगण्याचा मूळ आधार आहे. शेतीशिवाय पर्याय नाही, हे मात्र अधोरेखित झाले आहे. जैविक शेती हाच आधार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून कृषीक्षेत्र यासाठी अपवाद नाही. शेतकरी देखील मोबाइल व इंटरनेट यासारख्या आधुनिक साधनांचा आपल्या कामासाठी उपयोग करत आहेत. कृषी क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत, सध्या हवामान बदल हे सर्वात मोठे संकट समोर असून यावर आपण कृषी संशोधनाच्या आधारे मात करू शकू. देशाचा विकास हा कृषी विकासावरच अवलंबून असून जैविक कृषी विकासाची मोठी जबाबदारी कृषी शिक्षणाच्या माध्यमातून तयार झालेल्या व होण्याऱ्या तज्ञ मनुष्यबळावरच आहे. भविष्यात जैविक तंत्रज्ञान वापरून शेती करणे आवश्यक असल्याचे मत ग्रामविकास अधिकारी धनंजय पवार यांनी कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर, प्रभुमाला शिक्षण व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय ऊस तंञज्ञान क्रांती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, माजी पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, ग्रामविकास अधिकारी धनंजय पवार, सी पी बागल, रो. जयंत हरिदास, डाॅ. अमोल मेटकरी आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यशाळेत अनेक शेतकरी संशोधकांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत पाणी फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते. याशिवाय ऑनलाईन दहा ड्रम विमुक्त शेती या विषयावर मंगेश भास्कर यांनी मार्गदर्शन केले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अमोल नवले, विकास इतापे, संगिता कुलकर्णी, बापू माने, प्रभाकर शिंदे सह रोटरी क्लब ऑफ पंढरपूर सदस्यांनी परिश्रम घेतले.