पंढरपूर सिंहगड मध्ये रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने ई- रूपी जनजागृती अभियान संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्यावतीने एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना ई- रूपी जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते.
या अभियानात मार्गदर्शक सीए संजीव कोठाडिया यांचे सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य व पंढरपूर रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सीए संजीव कोठाडिया बोलताना म्हणाले, ई-रुपी अशी व्यवस्था आहे, ज्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि सोई-सुविधा पुरवणाऱ्यांच्या दरम्यान कोणत्याही मध्यस्थाचा समावेश नसतो. कारण सरकारकडून वाऊचर देणाऱ्यांद्वारे 'ई-रुपी'मार्फत थेट लाभार्थीच्या मोबाईलवर थेट मदत पाठवली जात असते. हे एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट माध्यम आहे. याद्वारे थेट लाभार्थीच्या मोबाईलवर ई-वाऊचर पाठवलं जाते. क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंगवर आधारीत ई-वाऊचरद्वारे लाभार्थींपर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे पोहचवण्यात मदत होत आहे. महत्वाचे म्हणजे, ई-वाऊचरच्या सहाय्याने ट्रान्झॅक्शनसाठी कार्ड, ऑनलाईन बँकिंग किंवा इतर डिजिटल पेमेंट अँपची गरज भासणार नाही.
याद्वारे थेट ट्रान्झॅक्शन म्हणजेच देवाण-घेवाण पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडरला पेमेंट मिळेल. अर्थात जेव्हापर्यंत वाऊचर तुमच्या मोबाईलमध्ये आहे, ते तुमचं आहे. या वाऊचरसाठी एक निश्चित सीमा असेल, या निश्चित वेळेत तुम्हाला वाऊचरचा वापर करावा लागेल. भविष्यात खुप मोठे बदल होणार आहेत. यासाठी इकॉनॉमी भक्कम असणे आवश्यक आहे. यापुढील काळात ऑनलाईन ट्राजेक्शन बंद होणार भविष्यातील दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. १५ कोट लोकांनी आधार कार्ड काढले आहेत असुन अनेक नागरीक आधार कार्ड पासून वंचित आहेत. ४० कोट फक्त लोक पॅन कार्ड ला लिंक आहेत. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञान येणार असुन घरी बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होईल. शासनाच्या अठराशे स्किम आहेत त्या आधार कार्ड ला लिंक आहेत यामुळे बोगस लाभ घेता येत नाही. डिजिटल युगात भविष्यात अनेक बदल होतील असे मत सीए संजीव कोठाडिया यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
या अभियानात रोटरी क्लब ऑफ पंढरपूर च्या सदस्या शुभांगी शिंदे उपस्थित होत्या. रो. शुभांगी शिंदे यांचे स्वागत प्रा. निशा करांडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयातील जवळपास २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी महविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले.