बदलापूर प्रतिनिधी
महामानव , विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन दीपक जननबंधु यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित, चळवळीच्या आणि परिवर्तनाच्या स्वरचित कविता आणि गजल काव्यफुलांनी प्रमुख मार्गदर्शक जीवन संघर्षकार साहित्यिक नवनाथ रणखांबे ( कल्याण) , साहित्यिक जगदेव भटु ( भिवंडी) , कवी गजलकर नरेश जाधव ( भिवंडी) , कवी शाम बैसाने यांच्या काव्य फुलांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.
पुढिल कार्यक्रमात सुभाष खैरनार यांनी बाबासाहेबांचे भारत देशासाठी दिलेले योगदान, सच्चे राष्ट्रभक्त, "गोलमेज परिषदेत इंग्रजांनी भारताची आर्थिक लूट थांबवावी." या आणि अश्या बाबासाहेबांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा आपल्या मनोगता मध्ये व्यक्त केले.
दीपक जनबंधु गौतम बचुटे शोभा ढाकरगे , अहिरे ताई, कुमारी प्रांजल बनकर गीत गायन केले तर उर्मिला खैरनार व कुमारी प्रमिला यांची भाषणे झाली. यावेळी प्रताप नितनवरे आणि अशोक कांबळे उपस्थित होते. पदाधिकारीसुरेश गोरे, सुदाम साळुंखे, पडघामोल बाबा, संदिप कांबळे, निशिकांत घोडके, त्र्यंबक खरात, विलास पडघामोल, तुकाराम माळी, लोखंडे आण्णा, टोंपे साहेब, ढोके साहेब, कांबळे बाबा,मिलींद इंगळे, यांनी कार्यक्रमाची धुरा वाहिली
महिला पदाधिकारी शर्मिला सहारे , अश्विनी बचुटे , सरिता खैरनार, शोभा गोरे , लता निकम , अल्का जनबंधू, कमल साळुंखे , शितल बनकर दुपटे , प्रिया भैसारे, सवणे , म्हस्के, जयश्री पडघामोल, इंगळे स्नेहा शहारे, ज्योती साळुंखे, यांचे योगदान लाभले तर कुणाल बचुटे, अनिकेत खैरनार, सुदेश गोरे, निखिल बचुटे, भूमिका खैरनार, सूरज गोरे, दामिनी जनबंधू, प्रियंका गोरे, श्रेया खैरनार, सशांक कांबळे इ. तरुण पिढीने कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.मोठ्या संख्येने बदलापूरकर रहिवासी महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन , प्रस्तावना, वंदना सूत्र पठण आभार,
उद्योजक, शिघ्र कवी सुभाष खैरनार यांनी केले.