वर्धा देवळी प्रतिनिधी
सागर झोरे धामणगाव वाठोडा येथे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया राज्याध्यक्ष विराज देवांग यांनी येथे भेट देऊन विद्यार्थांना मार्गदर्शन करून संघटनेच्या सभासद नोंदणी प्रारंभ आज 24 डिसेंबर रोजी करण्यात आला.
एआयएसएफ ही विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन लढणारी संघटना असून विद्यार्थांच्या अडी अडचणी व समस्या त्यांनी जाणून घेतल्या .
यावेळी विराज देवांग ,वैभव चोपकर भंडारा जिल्हा उपाध्यक्ष, अथर्व निवडींग, किसान सभेच्या जिल्हा सचिव द्वारका इमडवार, बोदड चे सरपंच अतुल नाईक यांची उपस्थिती होती.
यावेळी तरुण , विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या विराज देवांग यांनी जाणून घेतल्या.
तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विदर्थांचे समस्या शासनाला निवेदनाद्वारे कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धामणगाव वाठोदा येथे एआयएसएफ सभासद नोंदणी करण्यात आली.