पुणे येरवडा प्रतिनिधी
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या "समता पर्व" या कार्यक्रमांतर्गत दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत कार्यक्रमाचे आयोजन थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या 132 व्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये संविधान विषयक व्याख्यानचे (विषय - अधिकार व कर्तव्ये) आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्राध्यापक श्री राजेंद्र कांबळे कार्यवाह, पुणे विद्यार्थी गृह हे प्रमुख अतिथी होते तसेच विचारपीठावर पुणे विद्यार्थी गृह इजिनारींग कॉलेजचे मा. श्री सत्यशोधक रघुनाथ ढोक, मा. श्रीमती संगीता डावखर,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे, श्री मल्लिनाथ हरसुरे विशेष अधिकारी(शा.नि.शा.)समाज कल्याण, पुणे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक मा. श्रीमती संगीता डावखर यांनी करून फुले शाहू आंबेडकर यांचे मुळेच बहुजनाला शिक्षण मिळाल्याचे सांगत, आज माझे सारखे अनेक महिला विविध क्षेत्रात उच्चाशिक्षण घेऊन पदावर कार्यरत आहेत ही पुण्याई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे मुळे मिळाले हे देखील विसरून चालणार नाही.पुढे त्या म्हणाल्या की समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत असून मोठयाप्रमाणात लाभार्थी विविध योजनांचा लाभ घेत असल्याचे देखील त्यानी सांगितले.
प्राध्यापक श्री राजेंद्र कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळींवर भाष्य करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या व्यापक विषयावर माहितीपर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य व त्यांनी वंचित घटकांसाठी केलेल्या विविध चळवळी याबाबत मौलिक मार्गदर्शन करीत आम्ही भारताचे लोक म्हणून आपल्या संविधानाचा आदर राखणे ही काळाची गरज आहे.याबाबतीत त्यांनी अनेक देशांचे संविधानापेक्षा आपल्या देशाचे संविधान हे सर्व समावेशक स्री पुरुष,जात धर्म,पंथ आणि सर्व 27 राज्याचा शेवटचा घटक लक्षात घेऊन सर्वांना समानता कशी आहे याचे अनेक उदाहरणे देऊन आपले संविधान न्यायिक असल्याचे देखील म्हंटले.
*सत्यशोधक श्री.रघुनाथ ढोक सरांनी* महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून "सत्यशोधक विवाह" फुले एज्युकेशन संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती देऊन सत्यशोधक विवाह संस्था व महात्मा फुले यांचे विचार यावर प्रकाश टाकला. समाजातील नव युवक - युवतींना उद्देशून सत्यशोधक पध्दतीने विवाह करण्याचे आवाहन करुन सदर विवाह मोफत लावून दिला जात असलेबाबत त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रमुख पाहुणे , मान्यवर यांचे शुभहस्ते महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.सुरवातीला उद्देशिका गीत सादर केले तर समारोप सत्याचा अखंडानेने झाला.
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
तसेच विशेष अधिकारी श्री मल्लिनाथ हरसुरे सरांनी सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तर सूत्रसंचालन राजेंद्र शेलार व मोलाची मदत निरीक्षक सौ.अर्चना होले ,वैभव लव्हे यांनी केले.