विशेष लेख
श्रीगुरु बद्दल काही लिहावं इतका मी मोठा नाही पण आजच्या दिनानिमित्त आपल्या मनातील विचार व्यक्त व्हावे म्हणून थोड फार लिहिण्याचा प्रयत्न
मी_शून्य_आहे_म्हणून_आम्हाला_तुमच्या_सारखे_गुरू_भेटलेहे #आमचे_पुण्य_आहे.
गुरूबिन_कौन_बतावे_बाट | #बडा_बिकट_यमघाट
कबीर महाराजांच्या दोह्या प्रमाणे गुरूंशिवाय जीवनाची वाट कळत नाही.. तसे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असो योग्य मार्ग दाखवणारे श्रीगुरु..जीवनात जगत असताना आपण योग्य मार्गावर जातोच असे नाही.. हा योग्य मार्ग दाखवणारे श्रीगुरु आहेत. श्रीगुरूंना आम्ही काका असे संबोधित करतो.. काकांसमोर कोणत्याही विषयी अडचण आली तरी ते योग्य मार्ग सांगू आम्हाला या अडचणीतून दूर करतात. येवढं नाही तर तो मार्ग सांगत असताना समोरच्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला कळेल का यांची ही काळजी काका घेतात. काका बद्दल बोलण्यासारखे खुप आहे. आम्हाला त्यांच्या बोलण्यातून उपदेश मिळतोच पण त्यांच्या कृतीतून ही उपदेश मिळतो. काकांची प्रत्येक कृती ही आम्हाला उपदेश देऊन जाते.
आपल्या वागण्याने दुसऱ्या कोणाला कधीच त्रास होऊ नये याची खबरदारी कायम काका घेता असतात.प्रत्यक व्यक्तीला वेळ देतात. किती व्यस्त असले तरी आपण दिलेला शब्द कधीच मोडत नाहीत. गुरून कडून शिकण्यासारखे खुप आहे...प्रत्येक व्यक्तीला लिहिलेला शब्द पाळने,दिलेली वेळ पाळणे..अश्या बऱ्याच गोष्टी आहेत.
गेल्या महिन्यात मला कॉलेजच्या प्रोजेक्ट दिला आणि त्यामध्ये महत्त्वाच्या अशा व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी सांगितले.
त्यावेळी मी काकांची मुलाखत घेतली.
ती अविस्मरणीय अशी होती.. अर्ध्या तासाची ही मुलाखत होती. यामध्ये त्यांनी जीवनात वारकऱ्यांसाठी जवळजवळ 30 वर्ष काम केले..असे सांगितले..त्या त्या मुलाखतीतील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे उत्तर मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो.
प्रश्न - आपल्या बालपणा विषयी काय सांगाल ?
माझं बालपण संस्कारक्षम अशा कुटुंबा मध्ये झालं. माझे आई -वडील दोघे ही वारकरी आणि वारकरी संप्रदायातील भजन करत असल्यामुळे लहानपणा पासून संत वाङ्मयाचे संस्कार, भजनाचे संस्कार आणि त्या वातावरणात बालपण गेलं. आई वडील जिकडं जातील तिकडं लहान असल्यामुळे सहाजिकच मला ही घेऊन जात होते. आणि त्यामुळे दिंडीला गेले की ते सोबत चालत असल्यामुळे आम्हाला सहभागी व्हावं लागत असायचं . सप्ताह मध्ये गेल्यानंतर तिथला हरिपाठ असेल,तिथले कार्यक्रम असतील तिथ पाऊल खेळणे असेल. या सगळ्या गोष्टी जास्त जवळून पहाता आल्या, अनुभवता आल्या. त्याचे संस्कार बालपणात झाले.
प्रश्न - आपल्या आई- वडिलांना आपण मोठेपणी काय व्हावे असे वाटत होते ?
माझे वडील उत्तम गायक होते. त्यामुळे त्यांना वाटत होत माझा एक तरी मुलगा चांगला गायक व्हावा. आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण या चार मुलानं मध्ये एक तरी गायक व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी मला ११८९ साली परांडा तालुक्यातील रुई या गावी गायन शिक्षणासाठी ते मला नेहमी पाठवायचे, दिवाळीची आणि उन्हाळ्याची सुट्टी त्यावेळा येते त्यावेळी आम्ही आमच्या घरी न राहता जे आम्हला गायन शिवणारे शिक्षक होते त्यांच्या घरी राहून गायनाचं शिक्षण घेण्याचा प्रत्यन केला. माझ्या वडिलांना वाटत होत मी गायक व्हावं पण या प्रवाहात असताना कश्या पद्धतीने कलाटणी मिळाली माहिती नाही. पण मी गायक न होता एक कीर्तनकार आणि प्रवचनकार झालो.
प्रश्न - आपल्याला महापालिका मध्ये नोकरी लागली आणि सरकारी नोकरी कोणी सोडत नाही आपण का सोडली ?
महापालिकेमध्ये १९९३ साली मी नोकरीला सुरुवात केली. याच्या अगोदर बिल्डिंग मेन्टन्सचा २ वर्षाचा कोर्स केला. यानुसार महापालिकेमध्येच १ वर्ष अँप्रेन्टीसशिप (Apprenticeship) केल. आणि त्या अनुभवाने सोलापूर महानगरपालिकेमध्ये सिटी इंजनियर या विभागात मी नोकरीला लागलो. तिथून पुढ माझ्या नोकरीचा प्रवास चालू झाला. परंतु मुलगा नोकरीला असेल तरच मुलगी देऊन लग्नाचा विषय समोर येतो. आणि मला लग्न करायचं नसल्यामुळे नोकरी सोडल्याशिवाय मुली पाहणं येन बंद होणार नाही. आणि म्हणून मी त्यावेळेला नोकरी सोडली.
प्रश्न - आपण आध्यत्मिक अभ्यास कधी पासून सुरु केला ?
उत्तर - आध्यत्मिक अभ्यासाला १९९२ प्रारंभ केला.
प्रश्न - तुम्ही वारकरी संप्रदाय मध्ये किती वर्ष काम करत आहात ?
उत्तर - वारकरी संप्रदायामध्ये दोन प्रकारचं माझं काम आहे. एक कीर्तन, प्रवचनातून जनजागृती करणे. हे मी १९९९२ पासून करतोय याला ३० वर्ष झाली. १९९८ सालापासून वारकरी संप्रदायाच्या काही व्यक्तींना बरोबर घेऊन संघटनेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला. म्हणजे जवळपास त्याही विषयाला २५ वर्ष होतात. आणि अश्या पद्धतीने कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून ३०वर्ष जनजागृती आणि संघटनेच्या माध्यमातून जवळपास २५ वर्ष वारकरी संप्रदायातील सामाजिक कार्याचा प्रवास आहे.
प्रश्न - वारकरी संप्रदाय वाढावा म्हणून तुमचे प्रत्यन कसे होते ?
उत्तर - वारकरी संप्रदाय वाढावा म्हणून जिथं जिथं मला कार्यक्रमाला बोलवतात तिथं त्या अनुसंघाने अभंग, ओवी, श्लोक घेतलेला असेल तर त्याच्या बरोबरीने संप्रदाय वाढावा यासाठी एक वेगळी जागृती नेहमी प्रत्यक कीतर्न प्रवचनातून करतो. याच्या शिवाय चँनलवरून वेगवेगळ्या वाहिन्यांवरून अनेक प्रवचन कीर्तन दिलेले आहेत. आणि त्यमुळे घराघरामध्ये पोहचत असताना. संप्रदायाच महत्व काय हे पटवून देण्याचा तिथं हि प्रत्यन केला. म्हणजे ग्रामीण भागातील खेडे गावात असेल शहरात असेल या माध्यमातून जनजागृती करून संप्रदाय वाढावा प्रत्यन केला.गणेशउत्सव, शिवजन्मोत्सव, नवरात्र असेल इतर जे पारंपरिक उत्सवत किंवा राष्ट्रीय सण आहेत. या निमित्ताने शाळा,कॉलेज, वेगवेगळ्या भागातील तरुण मूल यांच्यातील कार्यक्रम कधी नाही म्हणत नाही. कोणी हि गणेशउत्सव कार्यक्रमाला बोलवू द्या मी जातो,. १० जरी मुले असले तरी मी त्याठिकाणी जाऊन व्याख्याने, प्रवचने देतो. कारण त्या १० जणांना तरी आपल्या बोलायला संधी मिळाली असं विचार करून अशा माध्यमातून ही वारकरी संप्रदाय वाढावा यांचा प्रत्यन करत असताना, श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून २०१० साली मोफत वारकरी शिक्षण संस्था सुरु केली.आणि हि संस्था १२ वर्ष याच पद्धतीने सांभाळी.आणि ग्रामीण भगातील बहुतांश मुलं काहीना गायनाचे, वादनच,कीर्तन, प्रवचनाचं अस वेगवेगळ्या त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या प्रयत्नानुसर त्यांना तयार करण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या माध्यमातून गावा - गावा मध्ये, भागाभागात बालसंस्काराचे आयोजन करण्यासाठी त्यांना भाग पाडले. सोलापूर शहरामध्ये आम्ही 1998 सालापासून जवळपास 6 वर्ष दरवर्षी महिन्यामध्ये बालसंस्कार शिबिर 1 मे ते 31 मे घेत होतो. हे शिबिर श्री संत मुक्ताई प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत होतो.अस अंदाजे 21 वर्ष बाल संस्कार शिबिर घेऊन मुलांवर संस्कार करून संप्रदाय वाढवा याचा प्रयत्न केला.आणि अलीकडे जसे मोबाईल, डिजिटल वाढलं. मोबाईलच्या माध्यमातून कार्यक्रम लाईव्ह करणे असेल. कार्यक्रमाच्या अनुसंगाने सोशल मीडियावरून विचार व्यक्त करणे असेल आणि तरुणांना,भाविकांना, इतरांना या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही वारकरी संघटना स्थापन केली ती केव्हा केली आणि त्याचा उद्देश काय ?
उत्तर - वारकरी संघटनेत मुळात माझा तीन संघटनेचा प्रवास आहे. 1998 साली समस्त वारकरी युवक संघटना,सोलापूर. सोलापूर शहरात सर्व महाराज मंडळींची मुल एकत्रित गेली आणि युवकांची एक संघटना स्थापन केली. तिथून मी 2005 साला पर्यंत त्या संघटनेच्या माध्यमातून काम केलं. 2005 साली अखिल भारतीय वारकरी मंडळाचा जिल्हा अध्यक्ष झालो.तिथून 2019 पर्यंत जिल्हा अध्यक्ष या पदाने काम केलं.2019 ला अखिल भारतीय वारकरी मंडळाचा प्रदेशाध्यक्ष झालो. आणि एकवर्ष त्याच काम करून.2020 साली अखिल भाविक वारकरी मंडळाची स्थापना केली. आणि तिथून आता पर्यंत त्या मंडळाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहे. समजमध्ये विचाराची संस्काराची गरज आहे.त्यामुळे समाजाला विचार आणि संस्कार देण्याचे मोठ व्यासपिठ, माध्यम म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि तो वाढवा त्या येणारे अडथळे बाजूला काढावे.त्यातील गुणवान व्यक्तींचा सन्मान करावा यांच्यासाठी संघटना स्थापन केली.
तुम्ही पाहिले कीर्तन कधी शिकलात आणि कोणाकडून शिकलात ?
उत्तर - मी पाहिले कीर्तन 1992 साली केलं.यांच्यासाठी मला सोलापुरातील लष्कर भागातील श्रोत्रीय ब्रम्हनिष्ठ दयाळू हरी भक्त पारायण वैकुंठवासी गुरुदास उर्फ विठ्ठल महाराज तोडमे ( तोडमे गुरुजी) यांच्या कडून मी अध्यात्माचे धडे घेतले.अभ्यास केला. गुरू आश्रयाला राहून सलग 9 वर्ष विचारचंद्रोय, विचारसागर, वृत्तीरत्नावली वृत्तीप्रभाकर अश्या प्रक्रिया ग्रंथांचा अभ्यास करत असताना वारकरी संप्रदायातील सुध्दा ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा चांगदेव पासष्टी, हरिपाठ अश्या विविध ग्रंथाचं श्रवण करून ज्या वेळेला मला अडचण निर्माण होईल त्या त्या वेळेला गुरूंकडून समाधान करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या हे शिक्षण घेतल आणि कीर्तनाला सुरुवात केली.
प्रश्न - संताना बद्दल काय सांगाल ?
उत्तर - संतान बद्दल सांगायचं झाले तर संत जर आ आले नसते तर या विश्वातला नव्हे, भारतातला नव्हे तर महाराष्ट्रातला प्रत्यक जन स्वैर बनला असता.कोणी कोणाचे नाते पाळले नसते. नात्याचा आदर दिसला नसता..एकमेकाच्या विषयी सहानुभूती दिसली नसती.सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक परंपरा, धार्मिक कर्तव्य कोणालाच कळले नसते.आणि म्हणून संत आले त्यांनी समाजामध्ये येऊन विचारांचे, ज्ञानाचे बीजा रोपण केले.हे उपकार संतांचे या समाजावर, प्रत्येकावर अंत असे उपकार आहेत.
प्रश्न - आताच्या भक्ती - भाव बद्दल आपले मत काय ?
उत्तर - सद्याच्या भक्ती भावा बद्दल विचार केला तर भक्ती भाव या परंपरे मध्ये, वारकरी परंपरेमध्ये संख्यात्मक वाढ मोठ्या प्रमाणात आहे. लोकांची संख्या जास्त आहे. फक्त कमी वेळे मध्ये आपल्याला जास्त काय करता येईल हा विचार प्रत्येकाचा मनात आहे.कारण या प्रवाह मध्ये सुखाची साधने वाढली आणि ती साधने महागडी असल्यामुळे पैसा मिळावा याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती पैशाला वेळ देऊ लागला. आणि म्हणून राहिलेल्या वेळे मध्ये मंदिरात जाणे असेल, सत्संगाला जाणे असेल, परायाणाला जाणे असेल इतर त्या सांगणे मग पालखी, दिंडी सोहळा याला मदत करणे सेवा करणे या गोष्टी दिसायलागल्या यावरून गर्दी वाढली म्हणून द्रदी कमी झाली नाही..पूर्वीच्या दर्दी ची टक्केवारी आणि आताच्या लोकसंख्या नुसार या गोष्टी दिसायला लागल्या यावरून गर्दी वाढली याचा अर्थ दर्दी कमी झाले असे नाही पूर्वीचा दर्दीची टक्केवारी आणि आत्ताची लोकसंख्येच्या दृष्टीने टक्केवारी जर विचारात घेतली तर दर्दीचे सुद्धा वाढ आहे.पण लोकसंख्येच्या मानाने ती कमी वाटते म्हणून त्याच्यावर वक्तव्य येताना पाहायला मिळतात की गर्दी कमी आहेत मूळ चांगले विचाराची अशी माणसं कमी आहेत असं आपल्याला संख्येच्या दृष्टीने मांडल जात पण पूर्वी संख्या आणि दर्दी याचा विचार केला तर त्या मनाला आता ते वाढलेले.
असे असणारी आमच्या श्रीगुरुचरणी साष्टांग दंडवत त्यांना आमचे ही आयुष्य लागो आणि समाजामध्ये त्यांच्या विचारांची प्रेरणा सदैव प्रेरित राहो हीच परमात्मा पांडुरंग चरणी प्रार्थना..
हभप सुधाकर इंगळे महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त तेज न्यूज परिवार कडून हार्दिक शुभेच्छा
शब्दांकन - शिवानंद जाधव
फोटो - Bhausaheb Belerao