सोलापूर प्रतिनिधी विठ्ठल वठारे
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर फॅक्टरी येथे ऊस तोडणी करिता आलेल्या कुटुंबातील १६ विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यात आले.
सध्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशान्वये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण युद्धपातळीवर चालू असून शनिवारी शिक्षण विस्तार अधिकारी जी.एस. सणके यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख रमेश माशाळे, केंद्रीय मुख्याध्यापक अण्णय्या स्वामी, मुख्याध्यापक केदार माळी ,पर्यवेक्षक रामेश्वर झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवय्या मसुती, धुळप्पा केगाव, अहमद जमादार यांनी गोकुळ शुगर फॅक्टरीला भेटी देऊन संबंधित पालकांना व कारखान्याच्या अधिकाऱ्यांना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत माहिती दिले.
या शाळाबाह्य सर्वेक्षणामुळे १६ विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वटारे , गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे व गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले.