पुणे - सुभाष मुळे
जॉय सामाजिक संस्था मुंबई यांना नुकताच राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार २०२२ जाहीर झाला असल्याचे जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सांगितले. जनजागृती या आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या संस्थेचा तृतीय वर्धापन दिनाचा भरगच्च कार्यक्रम बदलापूर येथे २० नोव्हेंबर रोजी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून यावेळी महाराष्ट्रात अग्रेसर राहून काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत असे तिरपणकर बोलले.
जॉय संस्था मागील अनेक वर्षांपासून राज्यात सातत्याने समाजातील गोर गरीब वंचित घटकांसाठी कार्य करीत असून प्रामुख्याने त्यांचा फोकस हा विद्यार्थ्यांवर राहिला आहे. आजही त्यांच काम जोमाने सुरू आहे.आमच्या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला हा मानाचा पुरस्कार मिळत असल्याने आमची जबाबदारी आणखी वाढली असून पुरस्कार हे अधिक जोमाने काम करण्यासाठी नवीन ऊर्जा देत असतात.आम्ही यापुढेही नक्कीच समाजासाठी कार्य करीत राहू असे जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संगितले.
यावेळी संस्थेला सहकार्य करणाऱ्या देणगीदार व हितचींतकांचे त्यांनी आभार मानले.जॉय संस्थेला पुरस्कार जाहीर झाल्यावर अनेक स्तरातून संस्थेचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.