चिंचणी प्रतिनिधी
फेसबुक वरचे आपले मित्र नवनाथ पोरे यांनी कल्पना मांडली.आपण प्रत्यक्ष एकदा एकत्र आलो आणि आपले फेसबुक फ्रेंड फाऊंडेशन तयार झाले.यामध्ये वेगवेगळ्या जातीधर्माचे, मतभेद असणाऱ्या विचारधारेचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असे सर्वजण या माध्यमातून आपण एकत्र आलो. आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये पुरबाधितांना आपण स्वतःच्या वर्गणीतून मदत करत आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मोहन अनपट म्हणाले पंढरपुरातील 30 शाळा/महाविद्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या.वेगवेगळ्या क्षेत्रातील कृतुत्ववान महिलांचा सन्मान केला. फेसबुक फ्रेंड फाउंडेशनचे एक दिवसीय संमेलन घेऊन परिसंवाद घेतला. अनेक बैठक मधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. अनेक मित्रांच्या सुखदुःखामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालो. मनोरंजनात्मक कार्यक्रम सुद्धा केले.
हे सर्व करत असताना या सर्वांचे केंद्र आपण कायम चिंचणी हेच ठेवले याचा परिणाम म्हणून चिंचणी सारख्या पर्यावरण व निसर्गप्रेमी गावात वृक्ष लागवड व संवर्धन यामध्ये आपण सहभाग नोंदवून पाण्याच्या व्यवस्थेबरोबर या गावाने ग्रामीण व कृषी पर्यटनाच्या केलेल्या नाविन्यपूर्ण कामाला कायम वेगवेगळ्या पद्धतीने प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे काम सातत्याने केले. यामधून या गावाला अनेक चळवळतील, राजकीय, अराजकीयआणि वेगवेगळ्या नेत्यांचा, मित्रांचा संबंध आला. तो पुढे वाढत गेला. आज चिंचणी हे एक आदर्श ते स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणारे राज्यातील मॉडेल गाव म्हणून पुढे येत आहे. असे हि मोहन अनपट म्हणाले.
या सर्वांमध्ये फेसबुक फ्रेंड फाउंडेशनचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभाग आहे .आता फेसबुक फ्रेंड फाउंडेशनने कोरोना नंतर पुन्हा चिंचणीत एक जल्लोषाचा कार्यक्रम करून कात टाकलेली आहे .पुन्हा आपण काही नव्या मित्रांना सोबत घेऊ या जुन्यांना भेटून त्यांना प्रवाहित करू या.