मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
मुंबईतील 'अभिजीत राणे' युथ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे राज्य स्तरीय कविता स्पर्धा, निबंध स्पर्धा, पत्र लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन इच्छुकांनी आपले साहित्य १५ डिसेंबर पर्यंत, स्पर्धेचे संयोजक श्री. गणेश हिरवे, २/१२,पार्वती निवास, राम नगर, बांद्रेकर वाडी, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई - ४०००६० या पत्यावर पाठवावे असे आवाहन फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
यामधे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'या विषयावरील १६-२० ओळींची स्वरचित (अगोदर प्रसिद्ध न झालेली) कविता, तर उत्कृष्ट पत्र लेखन स्पर्धेसाठी १ जानेवारी ते ३१ आँक्टोबर २०२२ या कालावधीतील प्रसिद्ध झालेली दोन पत्रे पाठवायची आहेत.
तर निबंध स्पर्धेसाठी १) मी पंतप्रधान असतो तर २)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. ३) कोरोना नंतरचे जग ४) शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील ५) महिलांचे देशाच्या विकासातील स्थान या पैकी कोणत्याही एका विषयावर १०००-१२०० शब्दांचा हस्त लिखित निबंध (टाईप केलेला नाही) पोस्ट वा कुरियरने पाठवायचा आहे. वृत्तपत्र लेखन स्पर्धेतील पाच विजेत्यांना तर उत्तेजनार्थ १० विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
तर कविता स्पर्धेतील पाच विजेते ( पारितोषिक, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह) तर पाच उत्तेजनार्थ (सन्मान चिन्ह, सन्मानपत्र) अशा दहा विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर निबंध स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे १२५०, १०००, ७५०, ५०० आणि २५० रोख पारितोषिक सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, तसेच पाच उत्तेजनार्थ पारितोषिके-सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती या स्पर्धांचे संयोजक-
स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे यांनी दिली असुन, इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन राणे युथ फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.