पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूरातील न्यायालयाने दरोडा प्रकरणी खटल्याचे कामकाज चालविण्याचे आदेश पारित केल्यानंतर, गुन्हा उघड होऊन, आपल्याला शासन होऊ नये या कुटील उद्देशाने दरोडेखोरांनी कायद्यातील पळवाटा शोधत, मुंबई उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा मागितलेली दाद फेटाळत, मुंबई उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विश्वस्तपदावरुन हाकालपट्टी झाल्यानंतर आपल्या गेलेल्या पदाचा आव आणत, आपणच विश्वस्त असल्याचा देखावा निर्माण करुन, पंढरपूरातील श्री संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा ट्रस्टच्या ९० खोल्यांचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊन, धर्मशाळेत वास्तव्यास असलेल्या राधेश बादले पाटील यांच्या घरावर पदच्युत न्यायमुर्ती बी जी कोसळे पाटील याने त्याच्या गैरसाथीदारांना सोबत घेऊन, ६०-७० आदिवासी/गुंड/चारित्र्यहीनांकडून दि.२९-०६-२०११ रोजी पावणेचार वाजता दरोडा टाकून लाखो रुपयांची लुट करुन राधेश बादले पाटील यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करुन, धर्मशाळा ताब्यात घेतली होती. याप्रकरणी पंढरपूर पोलिसांकडे न्याय्यवृती नसल्याने तसेच दबावाखाली दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे अन्याय झालेले फिर्यादी राधेश बादले पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये पंढरपूर न्यायालयात न्यायालयीन चौकशी होऊन, पंढरपूर न्यायालयाने मुख्य दरोडेखोर बी जी कोसळे पाटील याला वगळून अन्य आरोपींविरुद्ध सबळ पुरावा आल्याने न्यायालयीन कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले होते. यात बी जी कोसळे पाटील याच्या गैरसाथीदारांनी केलेले पहिले अपील पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयाने दि.२१-१०-२०२१ रोजी फेटाळले होते, त्यावर कायद्यातील पळवाटा शोधत दरोडेखोरांनी आपल्या दुष्कर्माची वसुली टाळण्यासाठी व मुळ फिर्यादीवर अन्याय करत, आपला गुन्हा लपवण्यासाठी, मुंबई उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा दाद मागून कहर केला होता. मात्र हे दुसरे अपील फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाने दरोडेखोरांना चपराक लगावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बी जी कोसळे पाटील याचे २ मुख्य दरोडेखोर असलेले गैरसाथीदार माजी प्राचार्य भाऊसाहे गोविंद जाधव, माजी लोकायुक्त डॅा.माधवराव विठ्ठलराव सुर्यवंशी, कोसळे पाटलाचे ३ खाजगी नोकर व ६०-७० चारित्र्यहीन दरोडेखोरांचा समावेश आहे. हे दरोडेखोर तिसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयात संत गाडगेबाबांच्या धर्मशाळेतील लुटीच्या पैशावर दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
यात वगलेला मुख्य आरोपी बी जी कोसळे पाटील याला ऐन तारुण्यात फक्त ४ वर्षे ३ महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच संत श्री गाडगे महाराज मराठा धर्मशाळा ट्रस्टच्या विश्वस्तपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. तरीसुद्धा हा इसम आपण आजही न्यायमुर्ती असल्याचे तसेच धर्मशाळेचे विश्वस्त असल्याचे शपथपत्र न्यायालयात देऊन न्यायालयाची दिशाभूल करुन, लाखो भाविकभक्तांची लुट करतो. या इसमाचे श्री गाडगे महाराज धर्मशाळेत शुन्य योगदान आहे. हा आपल्या गेलेल्या पदाचा टेंभा मिरवित, समाजात तेढ निर्माण करुन, राष्ट्रीय नेत्यांसह राष्ट्रपुरुषांवर टिका करित बोंबलत हिंडत असतो, हे विशेष! अन्यथा एखाद्या देशपातळीवरील नेत्यांना लोणी लावत फिरत असतो. कोसळे पाटील याच्याकडे मिरज व येरवडा येथील प्रमाणपत्र असल्याने याच्या कोणीही नादी लागत नाही. द्वेषमुलक वक्तव्याचा भुरटा म्हणून, तसेच वारकऱ्यांच्या सोनखतावरील वराह म्हणून याची नोंद चोहिकडे असल्याने राधेश बादले पाटील न्यायासाठी वणवण भटकत आहेत, ११ वर्षे न्यायापासून वंचित आहेत, हे विशेष!