नवी मुंबई प्रतिनिधी
रासायनिक खतांचा वापर यामुळे शेतीची माती ही खराब होत असून देशातील जनतेचे आरोग्य धोक्यात येऊन आजारात वाढ होत आहे असे मत व्यक्त करत स्वतःच्या कुंदुंबाचे आजाराचे उदाहरण देऊन रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगितले देशातून व महाराष्ट्र मधून कुठूनही विद्यार्थी, लोक माझ्याकडे गावठी बियांनाची माहिती घेण्यासाठी येत आहेत व सदर माहिती पुढेही सदैव देत राहील व देशातील शेती सेंद्रीय करण्यासाठी प्रयत्न करत रहाणार असल्याचे पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे यांनी रविवारी स्वीट होम ट्रस्ट च्या प्रस्तुत कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले.
रविवारी ६ नोव्हेंबर ला मराठा साहित्य संस्कृती मंडळाच्या सभागृहात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांसाठी झाशी राणी व पुरुषांना शुभेदार नरवीर तानाजी मालुसरे नावाने स्वीट होम ट्रस्ट च्या प्रस्तुत नियोजनातून पुरस्कार देत गौरविण्यात आले सदर प्रसंगी गायक संतोष चौधरी (दादुस) यांनी देवीच्या भक्तिमय गाणे गात सभागृह भक्तिमय करत सर्व प्रमुख पाहुण्यांनी ठेका धरत नृत्य केले. व डॉ. शितल मालुसरे यांनी इतिहासावर मार्मिक बोध देत सर्वांचे लक्ष केंद्रित केले. सदर पुरस्कार देण्यासाठी प्रमुख पाहुणे पद्मश्री राहीबाई पोपेरे, गायक संतोष चौधरी (दादूस), तानाजी मालुसरे घराण्यातील सुन डॉ. शितल मालुसरे, समाजसेविका डॉ. स्नेहा देशपांडे, राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते बसवराज गोवेकर व इतर मान्यवर यांचे स्वीट होम ट्रस्ट च्या संचालिका सौ. प्रतिभाताई कारेकर यांनी सर्वांचा सन्मान करत आभार व्यक्त केले.