लोकशाहीच्या राज्यात पत्रकारांनी कधीही निर्भिडपणे बेधडक लेखणी केली पाहिजे आणि हिमतीने करा...! लेखणीनेच तुमची राजकिय वर्तुळात आणि सामान्य लोकांना नक्की ओळख पटेल की तुम्ही कसे पत्रकार आहात..? लेखणीचा तुम्ही ध्यास घेतला असेल तर,लेखणीच्या पूर्ण सामर्थ्याने लढा द्या.पत्रकारिता करताना भुकेच्या कळा सहन करायला शिका.तेव्हांच तुम्ही लेखणी करू शकाल...! पोट भरलेलं असेल तर वेळेवर शब्द ही सुचत नाही...!कोणत्याही विषयावर बातमी लिहिल्यानंतर पुन्हा ती एकदा नीट डोळ्याने वाचा आणि मग आपल्या दैनिकात अथवा न्युज चॅनल ला सेंड करा..नाहीतर चुकीची बातमी लिहिल्यामुळे खुलासा द्यावा लागतो.किंवा 'ध' चा 'मा' होता कामा नये.
रुग्णालयात एकाद्या व्यक्तीचा गंभीर उपचार सुरू असेल आणि तो दगावल्याची कानी बातमी आली तर,आधी पूर्ण खात्री करून घ्या ,नाहीतर ब्रेकिंग न्युज साठी ,बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला मृत घोषित कराल, आणि दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात खोटी बातमी प्रसिद्ध केल्याची बोंबाबोब सुरू होईल.म्हणून डोळ्याने पाहावे,कानाने एकावे मग,मजकूर लिहावा.
बातमीचे काम झाल्यानंतर थोडीशी पोटाची भूक भरा..! उपाशी राहू नका,उपाशी राहून पत्रकारिता कराल, तर कोणी तुम्हाला जेवायला देणार नाही.आपल्या जवळील पैशाने वेळेवर काही मिळेल ते खा.वडा पाव,चहा बिस्किट खाल्ले तरी चालेल,कुणा राजकारणी व्यक्ती कडे भोजनाची किंवा नाष्टा ची अपेक्षा करू नका,जर त्यांची बातमी लिहिली असेल तर मानधन,जाहिरात घ्या. अशा सवयीने पत्रकारिता खरी अनुभवायला मिळेल.तेव्हाच तुम्हाला लेखणीची सामाजिक लथ लागेल कदाचित तुमच्या निस्वार्थ लेखणीमुळे एखाद्या गरीब व्यक्तीला न्याय मिळेल.हे अनुभव पत्रकारांनी परिश्रमाने घेतले पाहिजे.एका जागी बसून,पैशासाठी कधीही पत्रकारिता करू नका...पैशाची जरी गरज असेल, तर सन्मानाने मानधन समजून घ्या...पण एखाद्या व्यक्तीला लुबाडू नका...! जेव्हा तुम्ही तन-मनाने बातमी शोधाल,तेव्हा धनही मिळेल.
एखाद्या व्यक्तीला न्याय मिळून देण्याचा हा पत्रकारांच्या निस्वार्थ लेखणीचा पहिला अधिकार आहे."राष्ट्रीय पत्रकार विकास महा समिती" चा मुळात हाच उद्देश आहे की ,पत्रकारांना मार्गदर्शन करून, योग्य मार्ग दाखविणे.दारू पिणे,तंबाखू,गुटखा ,पान खाणे हे वर्ज करा..! कोणतीही नशा घातक आहे.धूम्रपान व व्यसनमुक्त पत्रकारांनी असले पाहिजे. मुळात आपली जबाबदारी ही लोकहितासाठी आहे.ते कर्तव्य निभावले पाहिजे..
आपण प्रथमतः जनतेचे प्रतिनिधी आहोत...हे विसरू नका..! जर आपणच असे वाईट कृत्य केले ,तर कुणाबद्दल बातमी कशी लिहू शकतो...? वरिष्ठ पत्रकारांनी अन्य पत्रकारांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.पत्रकार पत्रकारिता करत असताना कधी तरी आपणच चुका करत असतो...मग पत्रकारांची धमक दुसऱ्याला राहणार कशी...?
काही विरोधकांचा एखाद्या हुशार पत्रकाराला व्यसनाच्या नादी लावून,बर्बाद करण्याचा त्यांचा हेतू असतो..आणि तो हेतू साध्य करण्याचा अनेक विरोधक प्रयत्न करत असतात. शेवटी तो व्यसनधारी पत्रकार दुसऱ्याच्या न्यायासाठी लेखणी करत असताना ,आपल्याच संकटात सापडतो...मग कोणीच त्याला सहकार्य करत नाही..मात्र त्याची टिंगल करत राहतील,त्याला मार्गदर्शन करणार नाहीत. म्हणूनच पत्रकार मित्रांनो जागे व्हा..! समितीच्या अंतर्गत जनजागृती करून एकत्र या...!!
पत्रकारांच्या एकतेनेच आपण शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवू शकतो..नाहीतर शासनाच्या योजना कागदावरच राहतील.पत्रकार व त्यांचे कुटुंब नामधारी पत्रकार कुटुंब असेच राहतील...! कोणतीही शासनाची सुविधा न मिळाल्याने त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल.पप्रामाणिकपणे सन्मानाने जगा व आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने अन्याय -अत्याचार वर आवाज उठवून दुसऱ्यालाही जीवनदान द्या...! अन्याय ग्रस्त पीडितांना जगण्यासाठी आपल्या लेखणीचा खरा आधार द्या...!
जयहिंद...!
वंदे मातरम्...!!
"राष्ट्रीय पत्रकार दिना" च्या विशेष हार्दिक शुभेच्छा...!
राष्ट्रीय पत्रकार विकास महा समिती -(राष्ट्रीय कार्याध्यक्ष - श्री.सुभाष द.पटनाईक.