सोलापूर प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मा.खा.श्री. राहुलजी गांधी यांची भारत जोडो पदयात्रेचे नुकतेच महाराष्ट्रात आगमन झाले असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी अकोला येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याच्या संदर्भात तयारी व नियोजन करण्या संदर्भात सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी महिला अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबतचा तपशिल सर्व उपस्थितांना सांगून सूचना देण्यांत आल्या. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवा माजी महापौर अलकाताई राठोड यांनीपण भारत जोडोयात्रे संदर्भात मार्गदर्शन केले.
महिला काँग्रेसचा भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्याप्रमाणे महिला काॅग्रेसची चलो अकोला चलो अकोला, नफरत छोडो भारत जोडो घोषवाक्य घेऊन भारत जोडो यात्रेत सामील होणेची जय्यत तयारी चालू आहे.
बैठकीस माजी महापौर अलकाताई राठोड, अॅड. करिमुन्निसा बागवान, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोंबे, अंजली मंगोडेकर, कोंडणताई काकडे, सबिना इंगळगी, शिल्पा चांदणे, माजी नगरसेविका अनुराधा काटकर, परविन इनामदार, बसंती साळुंके, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, चंदा काळे, जगदेवी कदम, राधा मोरखडे, प्रा.संगमित्रा चौधरी, स्नेहल शिंदे, संतोषी गुंडे, अनिता भालेराव, मिना गायकवाड, आसमा कुमसी, नीता बनसोडे आदींची उपस्थिती होती.