सोलापूर प्रतिनिधी
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दि. ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्याच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन संयुक्तपणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
ही योजना दि. ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीकरिता खंडीत झाली होती. तथापि, शासन निर्णय शेअवि- २०२१/प्र.क्र.१८/११/दि. २८ नोव्हेंबर २०२२ नुसार उपरोक्त कालावधीतील प्राप्त विमा दाव्यांना तपासणी नंतर मंजुरी देण्यात येणार आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील दि. ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्याच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी तात्काळ संपर्क साधून विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.