एक टन ओव्हरलोड असेल तर एक लाखापर्यंत दंड होणार
ट्रॅक्टर बजाटला (बैलगाडीला)तर पाशिंग आणि परवानगी नसल्यामुळे जप्त होण्याची शक्यता
पंढरपूर प्रतिनिधी
RTO नियमानुसार एक ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्यामध्ये फक्त दहा टन ऊस वाहतूक करता येते परंतु सर्वच ट्रॅक्टर मालक 25 ते 30 टनाने उसाची वाहतूक करत असतात आरटीओच्या कायद्याने विचार केला तर दहा ते पंधरा टनाने ओव्हरलोड वाहतूक सर्व ट्रॅक्टर मालक करत आहेत ओव्हरलोड वाहतुकीचा दंड हा पाचपट असतो त्यामुळे दहा टना पेक्षा वरच्या प्रत्येक टणाला 50 हजार ते एक लाख रुपये दंड आरटीओ कडून केला जाणार आहे त्यामुळे ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी आरटीओ चा धसका घेतला आहे...
ट्रॅक्टर मालकांना वारंवार सांगूनही हार घालून हात जोडून पाया पडूनही ऐकायला तयार नाहीत त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीला नाव इलाजाने आरटीओ कडे जाण्याची वेळ आली आज पासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र आरटीओ ची पथके नेमुन कारवाईला सुरुवात होणार आहे अन्यथा ऊस दर संघर्ष समितीच आरटीओ विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे ऐन दिवाळीतच ट्रॅक्टर मालकांचे दिवाळे निघण्याची शक्यता आहे
सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये वेगवेगळी अकरा पथक नेमून कारखान्याच्या गेटच्या आत जाऊन सुद्धा ओव्हरलोड ट्रॅक्टरचे वजन काट्यावर वजन करून कारवाई होणार आहे टी आर चे ड्रायव्हिंग लायसन इन्शुरन्स टॅक्स पासिंग इत्यादी सर्व आवश्यक बाबी ट्रॅक्टर मालकांनी पूर्ण केलेल्या नसतील तर मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीच्या या अजब फंडा बघून सर्वजणच चक्रावून गेले आहेत ऊस दर संघर्ष समितीने कायद्याच्या चाकोरीतूनच ट्रॅक्टर मालक व कारखानदारांना गुडघे काय लावण्याची ही योग्य वेळ साधली आहे आता आपल्या ऊसाला नक्की काहीतरी वाढवून दर मिळेल अशी आशा गाव खेड्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे