आज संपूर्ण देशपातळीवर पाहिले तर आपला देश प्रगतीपथावर आहे हे खरे आहे.देश जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था पण आहे. पाचवी अर्थव्यवस्था पण मानवी विकास निर्देशांकात 132 वा क्रमांक ही किती मोठी तफावत आहे.म्हणजेच भारतात श्रीमंत हे श्रीमंत होत चाललेत व गरीब गरीबच राहत आहेत. स्वच्छता, संरक्षण, शिक्षण, आरोग्य,स्री -पुरूष समानता, कायदा हे सर्व रामभरोसे चालतात म्हणून भारत 132 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
भारत हा खेड्यांचा देश आहे.जगातील 17.50 टक्के लोकसंख्या व 2.4 % क्षेत्र असणारा देश जास्तीत जास्त खेड्यात वसला आहे.या खेड्यातील पायाभूत सुविधा जेव्हा सुधारल्या जातील.तेव्हा भारताचा HDI सुधारला जाईल.तेव्हाच भारतीय प्रगतीपथावर आहे म्हणणें योग्य ठरेल.
मग ग्राम सुधारणा म्हणजेच गावकुस सुधारण्यासाठी काय करावे लागेल.पहिले गावकुसाबाहेर मनभेद सोडून द्यायला हवेत.विकासाच्या वेळी राजकीय चाल गावाचा विकास धरून खेळली पाहिजे का ?
त्याअगोदर महत्वपूर्ण आहे.समजदार, विकासाची चाढ असणारी माणसंच ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक जावीत.त्या व्यक्तीला मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असावे. शिवाय गावाच्या हितासाठी काम करण्याची तळमळ असावी.कुणी तरी, कुणाच्या तरी सांगण्यावरून घोड्यावर बसवलेला नसावा.शिवाय ग्रामपंचायतीचे कामकाज कसे चालते हे माहीत नसेल सांग काम्यांनी जागा अडवून धरू नये.ज्यांना पाच वर्षांत आपल्या वार्डात काय चालले माहीत नसते व गावात काय चाललेय कसे माहित व्हायचे.निवडून देतानाच लोकांनी कामांच्या मानसांना निवडणूक द्यायला हवे.जागा अडवून धरणाऱ्याला नको. ग्रामसभेत चार शब्द आपल्या वार्डाबद्दल बोलता यायला हवे अशा लोकांची निवड सर्व प्रथम लोकांनी करावी. माझा पावणा,माझी भावकी फक्त चारच दिवस दिसते.निवडणूक झाली की, पाच वर्षं कोणाच्या कामी येईल का याचा विचार करावा. पैसा, भावकी,भाऊ बंदकी व सखे सोयरे यांचा विचार करून जर बहुमूल्य मतदान करत असाल तर गावच्या लोकांचा पहिला गेम इथेच होतो.मग अशी कित्येक वर्षे आपण सोसत आलोच आहे..हे सर्वच बदलायचे असेल तर गावकी पासून भावकी सुधारायची असेल तर सर्वप्रथम पावणा,रावळा, भावकी यांचा विचार न करता सुज्ञ व कामसू व्यक्तीला गावचा कारभार हाकायला संधी उपलब्ध करून द्यावी. आपण गावांसाठी काही तरी करू शकू अश्यानेच निवडणूकीत उभे राहावे . खुर्ची अडवून ठेवण्यासाठी नको.
कालचा गावं,आजचा गावं, उद्या चा गाव यात काही तरी बदल करतोय याची जाणीव व माहिती असेल अशा व्यक्तींची निवड लोकांनी करावी.गावात येवून पानटपरी मावा खाऊन चार पिचकाऱ्या मारत बसणारा काय कामाचा असेल.बाईलवेडे ,गुत्यावर जाऊन बसणारे, शिवाय रात्रीची सोय कोणता कार्यकर्ता करेल का ? अशा विचारांच्या लोकांना लोकांनी मतदान करताना विचार करावा.कारण आपले छोटी छोटी मुलं यांचाच आदर्श घेणार आहेत.कारण 15 ऑगस्ट व 26 जानेवारी राष्ट्रीय सणाच्या वेळी हेच झेंडे फडकवण्यासाठी पुढे असतात व त्यांचे विचारांचे वादळ त्यावेळी आपली मुलं ऐकत असतात.
आज गावातील कित्येक लोक स्थलांतरीत होऊन गाव सोडून जातात.याच कारण गावात काही तरी कमतरता आहे म्हणूनच की. इच्छा नसतानाही लोकांना गाव सोडून बाहेर जावे लागते.फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी..
आपल्या गावात काय आवश्यकता आहे.याची जाणं असणारे गाव पुढारी असावेत. गावचा सर्वांगीण विकास, वीज, चांगले रस्ते, पिण्यासाठी चांगल्या पाण्याचा व्यवस्था, शेती साठी पाणी, विशेष चांगल्या शाळा निर्माण करणे, शाळांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्या सुविधा प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात कराव्या.शाळा तपासणी वारंवार कराव्यात कराव्यात.कारण चांगली किंवा वाईट पिढी येथूनच निर्माण होणार असते.
परंतु देशपातळीवर व राज्य पातळीवर जशी घराणेशाही चालू असते . तसेच गावपातळीवर तेच घडते तेव्हा विकासाचा बट्ट्याबोळ होऊन जातो. मग होते काय फक्त निवडणूक नावाचीच होत राहते. पक्षाच्या व भाऊ बंदकी च्या नावाखाली उत्तम प्रकारचे राजकारणाचे डाव खेळले जातात. मग गावचा विकास यांच्या खिशात नाचू लागले.पुन्हा पाच वर्षे लोकांनी विविध कार्यालयाला धडका खात बसायचे.अशा लोकांना गावच्या विकासाचे काही पडलेलं नसतं.आपला खिसा सतत गरम रहावा याकडे जास्त कल असते.असे चित्रपट वर्षीन वर्षे चालू आहेत.त्यामुळे हे सर्व लापाट झालेत.
खरंच गाव बदलायची इच्छा असेल तर लोकांनी आपले विचार बदलायला हवेत. *जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट व आत्मविश्वास असणारी सक्षम मानसं गावाचं नेतृत्व करायला पुढे सरसावली पाहिजेत.* अशांनाच लोकांनी ही निवडून दिले तर गावाचा कायापालट होईल.
खरं पाहता ग्रामपंचायती पहिल्या पेक्षा कितीतरी पटीने सक्षम झाल्या आहेत. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा ताल खुप बदलला आहे. मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार सरपंचांना मिळाले आहेत आता.यात किंचित ही अतिशयोक्ती नाही.
पण एक घोळ होतो.सरपंचाला आपल्या अधिकाराची माहिती असणे गरजेचे आहे.त्यासाठी त्याला किमान मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असावे. मग तो कोणाच्याही दबावाखाली काम करणार नाही.
सरपंचांने ठरवले तर तो गावचे नंदनवन करू शकतो. मात्र सर्वप्रथम त्यांच्या मनाने ते ठरवले पाहिजे. पण ते वाटते तितके समजही नाही.गावातील समाज,जात ,धर्म, गावगाडा, भावकी, मानपान, श्रद्धा अंधश्रद्धा इ.अनेक गोष्टींचा सामना करूनच पुढे जावे लागणार आहे. परंतु या सर्वांवर विकासाच्या माध्यमातून मात करता येते.
गावच्या विकासासाठी ध्यास घेतला असेल तर अशा नेतृत्वांना नक्कीच विविध सोपस्कार मार्ग मोकळे असतात. त्यासाठी सरपंचाला तलाठी, ग्रामसेवक किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या मागे लागत किंवा त्याला कुरवाळत बसायची वेळच येणार नाही.आपले अधिकार तो उत्तम रीत्या गाजवू शकतो.
सुरवात ही सोप्या कडून अवघडाकडे करावी.
1) गावची शिक्षण व्यवस्था मजबूत करणे.त्यातून युवा पिढी सक्षम करण्यावर भर देणे.
2) समाजसेवेची आवड असणाऱ्या लोकांची पाठराखण करणे.त्यांना सक्षम करणे.
3) गावातील युवा पिढीला चांगली व्यायाम शाळा निर्माण करून देणे.
4) विकासाचा ध्यास असणाऱ्या युवकांना ग्रामसभेत बोलण्यात प्रोत्साहन द्यावे.त्याचे प्रश्न ऐकून विचारमंथन करून प्रश्न सोडविण्यावर भर देणे.
5) विविध शासकीय योजना लोकांपर्यंत सहज पोहोचवता कशा येतील. यासाठी युवकांची फळी निर्माण करणे.
5) अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या तरुणांच्या पाठीवर हात टाकून त्याला सक्षम करावे.
6) व्यसनमुक्ती करणे. हेच गावच्या विकासाचे फलित असेल.
7) वृक्षारोपण माझी जबाबदारी म्हणणारे नेतृत्व विकसित करणे.
8) गावच्या विकासाला बाधक,भविष्याच्या दृष्टीने गावात काही घडत असेल तर राजकीय मतभेद विसरून त्याला आळा घालण्यासाठी एकत्र यावे.
अजून खूप काही करता येईल... बाकी आपणाला ही सुचेल... शेवटी माझे गाव माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे.
प्रा.आनंदा आलदर,9765066247