सोलापूर प्रतिनिधी
अखिल भाविक वारकरी मंडळ यांचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ता.16-10-2022 रोजी सकाळी 10.00 वा. भव्य आणि दिव्य
" वारकरी मेळावा " आयोजीत करण्यात आला होता. ह. भ. प. भागवत महाराज चवरे पंढरपूर ( राष्ट्रिय उपाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली व खा. जयशिद्धेश्र्वर महास्वामी , आ. विजयकुमार देशमुख , अमोल बापू शिंदे , शिवानंद पाटील, दत्तात्रय सुरवसे, भास्कर भांगे (प्रदेश उपाध्यक्ष), विनोद महाराज सरवदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन करून श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्तीपुजन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
भाविक वारकरी मंडळ अल्पावधीत लोकप्रिय झाले असे मत आ. विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की. लवकरच वारकरी भवन सोलापूर शहरा मध्ये होईल. इतर मान्यवरांनी आपापले मत व्यक्त करुन मंडळाच्या कार्याचा गौरव केला. धाराशिव, सांगली, परभणी , सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांनी संघटने संबंधी विचार व्यक्त केले.
ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी भाविक वारकरी मंडळ का स्थापन करण्यात आले , या विषयी बोलताना संघटने संबंधी घटनात्मक धेय व धोरण सांगुन सर्व रचनात्मक माहिती देऊन मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वारकरी मेळावा घेण्यात येईल असे जाहीर केले. या मेळाव्या मध्ये वारकरी संप्रदायाची निष्काम सेवा व विशेष योगदान ज्यांचे आहे त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्या मध्ये ज्ञानेश्वर अवताडे , शंकर भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख किरण श्रीचिप्पा व संत तुकाराम महाराज पालखी श्रीकांत ढगे यांचा ही सत्कार करण्यात आला.
निर्मल कुमार फडकुले सभागृह , श्री सिध्देश्वर मंदिर शेजारी, सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
" हेची आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम || " या संत उक्ती प्रमाणे संघटनेची वाटचाल करण्यासाठी हे घोष वाक्य म्हणून जाहीर केले आहे.
वारकरी संप्रदायाचा प्रचार- प्रसार करणेसाठी प्रयत्न , संप्रदायातील तरुणांची वाढ करणेसाठी विशेष प्रयत्न , दिंडी सोहळा पालखी सोहळा यातील अडी - अडचणी दूर करणेसाठी प्रयत्न , वारकरी संप्रदायाची निष्काम सेवा करणाऱ्या गुणीजनांचा गौरव करणे , काळानुसार बदलत्या प्रवाहा बरोबर संत विचार घेऊन जाताना पारंपरिक पद्धतीच्या कीर्तन - प्रवचन यातील सात्विकता टिकवणे , ई. कार्य व संघटनात्मक पातळीवर मान्यवरांनी मत मांडले . या हेतूने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करुन जिल्हा , तालुका, शहर सर्व कार्यकारिणी गठित करण्यात आली .
या मेळाव्यासाठी बहुसंख्य महिला , पुरुष भाविक, वारकरी व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्र संचालन संजय पाटील यांनी केले व प्रस्तावना जोतिराम चांगभले यांनी केली.
या मेळाव्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि भाविकांनी परिश्रम घेतले. ते पुढील प्रमाणे सर्वश्री बळीराम जांभळे , बंडोपंत कुलकर्णी, मोहन शेळके, संजय पवार , किसन कापसे, किरण श्रीचिप्पा , विष्णुपंत लिंबोळे, निवृत्ती मोरे , कुमार गायकवाड, अभिमन्यू डोंगरे महाराज, नागनाथ पाटील साहेब, हरिहर मोरे, सचिन गायकवाड, गोविंद लोंढे, दत्तात्रय सरवदे,नागनाथ शिंदे, गणेश वारे, महेश चोरमुले,दत्तात्रय भोसले, ज्ञानेश्वर भगरे , नवनाथ मोरे , आदि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.