उल्हासनगर प्रतिनिधी - गुरुनाथ तिरपणकर
अखिल महाराष्ट्र साहित्य मंच, गझल समूहातर्फे नवरात्रीचा शुभमुहूर्त साधत, दुर्गष्टमीच्या दिवशी ऑनलाईन गझल मुशायरा, गझलतरंग' या कार्यक्रमाचे आयोजन सन्मा.योगेश चाळके सर व गझल कोअरकमिटी द्वारे आयोजित केले गेते होते. कार्यक्रमाची सुरुवात सौ. मेघना पाटील ह्यांनी गझलकार योगेशजी चाळके सर ह्यांच्या स्वागत शब्दसुमनांनी सजलेल्या दोन शेरांनी केली. व उपस्थित सदस्यांचे स्वागत केले.
गझलतरंग, गझलमुशायराचे अध्यक्षस्थान गझलकार आणि गझलगुरु मुक्तासुत अर्थात सन्मानीय योगेश चाळके सर यांनी भूषविले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात गझल कशी असावी आणि गझल कशी नसावी गझलेत मानसन्मान व आदराने समजून-उमजून अशी रचना केली जातेव ती चांगली वृत्ती समजली जाते व त्यातूनच एक नवचैतन्याच आनंद मिळतो तसेच व्याकरण दृष्टीने विचार करावा ह्याबद्दल थोडक्यात पण अतिशय सुंदर मार्गदर्शन सरांनी केले. नवोदितांसाठी हे मार्गदर्शन नक्कीच फार उपयोगी ठरणार आहे. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सौ.मेघना पाटील ह्यांनी कुठेही वेळेचा अपव्यय होणार नाही आणि कार्यक्रम रंगतदार होईल ह्याची काळजी घेत अतिशय सुंदर रित्या पार पाडली.
गझलतरंग, गझल मुशायरामध्ये अनेक नामांकित तसेच नवोदित गझलकारांनी आपली गझल सादर केली. सौ किरणताईं मोरे चव्हाण, सिंधू बोदले, नीलिमा ताटके, सौ.गौरी शिरसाट, सौ मानसी जोशी, डाॅ.रेखा देशमुख, रेणुका जोशी, विजय भगत, प्रा. मोहन काळे, कविता पुणतांबेकर, सौ. लता गवळी, पल्लवी उमरे, दिनेश कांबळे, प्रिया मयेकर, सौ.मेघना पाटील आणि स्वतः अध्यक्ष मुक्तासुत अर्थात योगेश चाळके ह्यांनी आपली गझल सादर केली. सगळ्यांच्या गझलांना उत्तम प्रतिसाद देत श्रोत्यांनी कार्यक्रमाला बहार आणली. सगळ्यांचे सादरीकरण झाल्यावर अध्यक्षांनी कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त केले.
त्यात अध्यक्षांनी आयोजकांचे, सूत्रसंचालक मेघना पाटील ह्यांचे आणि सगळ्या, विशेषतः नवोदित, गझलकरांचे कौतुक केले. कार्यक्रमा अंती प्रिया मयेकर ह्यांनी अध्यक्षांचे, आयोजक मंडळाचे, उपस्थित गझलकार आणि श्रोत्यांचे समूहाच्या वतीने आभार प्रकट केले.