अकलूज प्रतिनिधी
रेल्वे मंत्रालयाद्वारे मुंबई-सोलापुर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सोलापूर येथून मुंबई व पुण्याला दर दिवशी जवळपास ५ हजार प्रवासी शिक्षण,व्यापार व इतर कामानिमित्त प्रवास करत असतात.वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने मुंबईहून पुण्यावरून सोलापूरला येणारे व सोलापूरहून वरील दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हे अंतर सद्यस्थितीपेक्षा निम्म्या वेळेत पार करता येणार आहे.अशी माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तेज न्यूजला दिली.
मुंबई-सोलापुर वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,मंत्रीगटाचे प्रमुख अमित शहा जी,उपमुख्यमंत्री.देवेंद्रजी फडणवीस,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनपुर्वक आभार मानले जात आहेत.