काल आमचे गुरू मित्र स्व .उमेश खेडकर यांचे पिताश्री ,आमचे पप्पा सूर्यकांत खेडकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि मातोश्री सौ .लता खेडकर मातृ गौरव सोहळा महाराष्ट्रातील सर्व वक्ते बंधू आणि भगिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता ....खरं तर आपल्या दिवंगत मित्राच्या आई वडील यांचा सोहळा मित्रांनी आयोजित केला होता यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे ...हे घडले आणि घडू शकते. त्यासाठी आपल्या घरी आलेल्या प्रत्येकाला मातोश्रींनी आपले मूल मानले त्यांच्यावर नितांत प्रेम केले ..पप्पांनी प्रेमाचा धाक ठेवला आणि अनेकांची आई आमच्या मातोश्री झाल्या खेडकर काका अनेकांचे पप्पा झाले.कारण महाराष्ट्रातील प्रत्येक वक्तृत्व स्पर्धकांवर केलेले प्रेम ,दिलेली मायेची ऊब. या सर्वांना तितकाच जीव लावणार्या तीनही भगिनी उज्ज्वला दीदी , उल्का दीदी , दिपू दीदी I या तिघीही आमच्या भगिनी झाल्या ....या माता पित्याने उमेश भैय्या यांच्यावर केलेले संस्कार .....उमेश भैय्या जगले आणि तेच संस्कार त्यांनी आपल्या मित्रांच्या जगण्यात आणले .....माझे गुरू मित्र स्व .उमेश भैय्या यांनी मैत्रीची अफाट संपत्ती कमावून इहलोक सोडून गेले ....त्यांची मानवतेची , प्रेमाची संपत्ती आजही तेवढीच आहे ....ती कमी होत नाही उलट वाढते आहे ...त्यांना जावून दहा वर्षे झाली तरी त्यांच्यावर आणि खेडकर कुटुंबीयांवर प्रेम करणार्यांचे प्रेम तसूभर ही कमी झाले नाही ....म्हणुन महाराष्ट्रातील शेकडो स्पर्धक मित्र 12-15 वर्षानंतरही या सोहळ्यास आले ....उपस्थित सर्व स्पर्धक मित्र आणि त्यांचे कुटुंबीय यांचे अंत:करण पूर्वक ऋणी आहे ...म्हणुन हा सोहळा बहारदार आणि अविस्मरणीय झाला ....
पप्पांचा व मातोश्रींचा सत्कार , पप्पांची ग्रंथतुला , बहिणींचे महाराष्ट्रातील सर्व भावंडाना औक्षण , सामूहिक भाऊबीज सर्वकाही अविस्मरणीय झाले ...
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उमा महाविद्यालय पंढरपूरचे माजी प्राचार्य डॉ .मिलिंद परिचारक सर उपस्थित होते ...त्यांचे मनोगत काळजात हात घालणारे आणि खेडकर कुटुंबीयांचे संस्कार परंपरेचा गौरव करणारे होते ....आमच्या भगिनी सुषमा ताई अंधारे , शिवसेना उपनेत्या या आमच्या प्रतिनिधी म्हणुन मंचावर उपस्थित होत्या...त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपस्थित राहिल्या त्याबद्दल आम्ही ऋणी राहू
...यावेळी व्यक्त झालेले वक्ते डॉ .महेश खरात सर , डॉ .सौ .अर्चना चव्हाण - थोरात , चंद्रकांत पाटील , सुरेश पवार सर ,भाचा दर्शन नागर आदींची मनोगते आठवणी जाग्या करणारी आणि उमेश भैय्या आणि आई पप्पांचे ऋण व्यक्त करणारी होती .....बंधू शशिकांत कराळे यांचे प्रास्ताविक हे खेडकर कुटुंबीयांचे स्नेहबंध उलगडून दाखवणारे होते .....बंधू मित्र संदीप मगदूम सर यांचे सूत्रसंचालन सेव्हन स्टार लावणारे ठरले ...नियोजन कार्यात मोलाची मदत दत्ता थोरे सर ,डॉ .संताजी पाटील , डॉ .सचिन लादे सर , राम मोरे , रवि ओहोळ सर , प्रताप चव्हाण सर , दीपक इरकल सर , शशिकांत कराळे, राजेश शहा, अँड व्हाईट अनंत देवकते , अमित वाडेकर सर , गणेश धांडोरे सर , सचिन मेलगे , शशिकांत घाडगे सर यांनी केली ....म्हणुनच हा सोहळा अविस्मरणीय झाला.
सोमनाथ गायकवाड ,पंढरपूर