पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घराच्या प्रश्नाच्या संदर्भात मनसे नेते दिली बापू धोत्रे यांनी आज पंढरपूर नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर नगरपालिका बांधकाम अभियंता पवार साहेब यांच्याबरोबर सर्व लाभार्थ्यांना घेऊन चर्चा केली .
यावेळी यापूर्वी नगरपालिकेने लाभार्थ्यांना तीस वर्षाच्या करारावरच घर देण्यात येतील अशी अट घातली होती, त्यामुळे लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज मिळत नव्हते .
गेल्या एक महिन्यापूर्वी ही अट रद्द करण्याची मागणी नगरपालिकेकडे आम्ही केली होती त्या मागणीचा विचार करून नगरपालिकेने ती अट रद्द केली आहे .
त्यामुळे लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ,तसेच बंद पडलेल्या घरांचे काम ताबडतोब चालू करून येत्या दिवाळीत घरांचा ताबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली .
या मागणीनुसार नगरपालिकेने लेखी पत्र दिले असून नगरपालिका लवकरच काम चालू करेल असे पत्र त्यांनी दिले आहे ,परंतु येत्या अठरा तारखेपर्यंत जर नगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेचे काम चालू नाही केले तर सर्व लाभार्थ्यांना घेऊन आम्ही घराचा ताबा घेणार आहोत.
यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण राज घाडगे ,मनसेचे पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे ,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, विवेक बेणारे सर्व लाभार्थी बांधव उपस्थित होते.