प्रतिधीनी पंढरपूर
राज्यात व आपल्या जिल्ह्यात मागील पंधरवड्यात मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करावेत आणि सरकारकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसाभरपाई मिळावी अशी सर्व शेतकऱ्यांच्या व शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने अशी मागणी करण्यात येत आहे.तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा मुलाबाळांची शालेय व शैक्षणिक फी माफ करावी, जेणेकरुन विद्यार्थांना शैक्षणिक गैरसोय होणार नाही.यापूर्वी शालेय फी भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे नैराश्याच्या भावनेने अनेक विद्यार्थीनी आत्महत्या केलेल्या आहेत.तरी बळीराजा असलेल्या शेतकर्यांची परिस्थिती ची दाखल घेऊन 10 /12 च्या विद्यार्थ्याची फी माफ करावी.
अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी केली.