मुलाचे पाय पाळण्यात दिसतात..,...
नाती भरपूर असतात होतात बनतात आणि मोडतातही पण त्यातील अस्सल निःस्वार्थ नाती टिकतात बाकी फाफड पसारा असतो.आजकाल नाती जपण खुप महत्वाचं असून आपल्या मनातील एकूण घेण्यासाठी मन मोकळं करण्यासाठी मोबाईल नसून त्यासाठी माणसेच लागणार लक्षात असूद्या त्या निमित्ताने एक सत्य घडलेल्या घटनेवर लिहितोय आवडलं तर नक्की कळवा.
माझी शांता आत्या....
हाक दिली की संकटात धाऊन येते.....
तिच्याकडे काही असो की नसो भरभरून प्रेम अन् जिव्हाळा माञ लावते.दिवाळीनिमित्त माझ्याकडे आली बऱ्याच दिवस राहिली आणि आज आम्हा बाप-लेकाला मायेने ओवाळल ,करदुडा दिला आणि गेली.........
राजरत्न ला तिचा लळा लागला पण म्हातारीला धूर देऊन गडी अंगणात दिसेल ते तोंडात चावित पळायचा, एका जागेवर तो कधीचं थांबत नाही. नेहमी घराबाहेर जायचा आणि ओरडली की गप्प बसायचा तिलाच जा..... म्हणायचा गुरकायचा. पण वयान उन-पाउस खाल्लेली मानस लहान मुलांचे अचुक वेध घेतात. त्यांना सांभाळण्याच त्यांच्याकडे वेगळं तंत्र असतं ते त्यांनाच जमू जान........ म्हणतात ना "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" अगदी तसाच माझी आत्या जाताना बोलली तुझा पोरगा खरंच लय चापटर आहे. तो तुझा बाप झाल्याशिवाय राहणार नाही तुझ्यापेक्षा जास्त मोठा होइल खुप हुषार आणि चपळ आहे. म्हातारीने सगळं बोलून कौतुक करुन वापस गेली तिला तिच्या गावी घरी सोडून आलो.......
काही नाती निस्वार्थी, काही स्वार्थी, काही मायाजाल तर काही नुसताच फाफड पसारा. या जगात अशी थोडी मानस भेटतात ती पिकल्या पाणाप्रामाने आसतात थोड्या काळासाठी नक्की जपा.जुन मायेचं नात जपलच पाहिजे हिच आपली संस्कृती हेच आपलं मराठमोळं मराठीपण......
डॉ.जितीन वंजारी