सातारा प्रतिनिधी
गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पवित्र भिमा, इंद्रायणी व चंद्रभागा इ.सह नद्यांचे होणारे प्रदुषण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
इंद्रायणीचे प्रदूषण याच विषयावर गुरुवर्य तात्यांनी २००८ साली डाऊ कंपनी विरोधी आंदोलन उभे केले व सर्व वारकरी संप्रदायाने त्यांना पाठींबा देवून,डाऊ कंपनी हटवण्याचा इतिहास घडवला. मात्र, डाऊ गेली तरी डाऊ सारख्याच अनेक कंपनीतून नदीपात्रात केमिकल युक्त दुषीत पाणी सोडले जात आहे. या कंपन्यांचा विळखा जो पर्यंत आहे तो पर्यंत भीमा, इंद्रायणी,चंद्रभागा कधीच शुद्ध व स्वच्छ होणार नाहीत. गेली पंधरा वर्षे तात्या या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.मात्र त्यांना प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
नूतन मुख्यमंत्री योगायोगाने सातारा जिल्ह्याचे असल्याने त्यांनी अल्पावधीत बंडातात्यांना भेट दिली. प्रदूषणाचे गांभीर्य सांगून त्यावर उपाय करण्याची विनंती तात्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औपचारीक होकार दिला असला तरी,सरकारी पद्धतीने याला विलंब होऊ शकतो.
कार्तिकवारी नंतर एक शिष्टमंडळ घेऊन मुंबई येथे मुख्यमंत्री कार्यालयात जावून त्यांना जाहीर निवेदन देण्यात येणार आहे.
दरम्यानच्या, काळात संप्रदायच्या सर्व स्थरातून शासनास या संबंधीचे निवेदन पत्रे जाणे गरजेचे आहे.