सोलापूर प्रतिनिधी
गेल्या वर्षी जाहिर केलेला 2660 रुपयेप्रमाणे व चालू गाळप हंगामाची पहिली उचल जाहीर करून आधी शेतकऱ्यांचे पैसे द्या, मगच ऊसाला कोयता लावा.
अशी ठाम भुमिका श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याच्या विरोधात फळवणी, कोळेगाव, निमगाव, मळोली या भागातील शेतकरी सभासदांनी घेऊन या कारखान्याला ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांची अडवणूक केली.आता एवढी खेप नेऊ द्या पण परत भरुन जाणार नाही या अटीवर ही वाहने सोडण्यात आलेली आहेत.
आता शेतकरी जागरुक झालेला आहे, कारखानदारांनीही शहाणं व्हावं अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सांगत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ही ऊस आंदोलनाची सुरवात झाली