मुंबई प्रतिनिधी
सोलापूर शहरातील महत्वाचे प्रश्न रस्त्यातील खड्डे, रस्त्याची दुराव्यवस्था, अपुरा आणि चार ते पाच दिवसाआढ पाणी, आरोग्य सुविधा, कचरा समस्या, स्वच्छता, ड्रेनेज, दुहेरी पाईपलाईन, परिवहन व्यवस्था, स्मार्ट सिटीची अर्धवट कामे, वाहतूक सुविधा, उद्योग आणि रोजगारवाढी साठी प्रयत्न करावे, गुंठेवारी खरेदी विक्री चालू करावी या विषयांवर सोलापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांनी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरचे महत्वाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.