पळशी प्रतिनिधी
पळशीतील जि.प.प्राथ.शाळा भुईटेवस्ती व झांबरेमळा येथील शिक्षक गणपतराव माळी व धनंजय नरळे याना पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला व पळशी गावचे सुपुत्र औदुंबर दत्तात्रय चव्हाण यानी रसायनशास्त्र विषयातून Ph.D.प्राप्त केल्याबद्दल त्यांचा जि.प.प्रा.शाळा भुईटेवस्ती व्यवस्थापन समिती व पळशी ग्रामस्थ यांचे वतीने सहर्ष सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
प्रथमत: शाळेचे मुख्याध्यापक महादेव झांबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविकात त्रिशूलजी जवळेकर यांनी आपले विचार मांडून सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले गार्डी जि प प्रा शाळेचे शिक्षक सिद्धेश्वरजी हाके यानी आपल्या मनोगतात सांगितले की,पुरस्कार प्राप्त शिक्षक हे इष्ट पात्रतेचे,प्रामाणिक कष्टाचे व जिद्दीने ध्येयपूर्तीसाठी झगडणारे व्यक्ती आहेत.त्यांच्या कार्यात सातत्य असून ज्ञानदानाची अविट गोडी व दानत असणारे व्यक्तिमत्व असल्यानेच त्यांची निवड झाल्याचे सांगितले.त्यानीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजक,पळशी गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील,मा.अजितदादा पवार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अशोक लोखंडे यानी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले,या शाळेला गुणवत्तेची परंपरा असून ती अबाधित ठेवण्यासाठी येथील गुरुवर्य अहोरात्र कष्टत आहेत.याची प्रचिती म्हणजेच हा पुरस्कार आहे.या शाळेत असलेले व शाळेतून बाहेर गेलेले सर्वगुणसंपन्न व परिपूर्ण बनतात.याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरळे व माळी यांच कष्ट,जिद्द व प्रामाणिक प्रयत्न याला मिळालेलं पुरस्काररुपी फळ आहे.
या पवित्र कार्यात माणसात माणूसच घडविण्यात फक्त गुरूच फलदायी ठरतात ही आजची पिढी विसरलेली आहे व ती शिक्षणातून,संस्कारातुन नैतिक मूल्यांची जडणघडण करुन ते सर्व गुण विद्यार्थ्यावर बिंबवण्याचे सफल कार्य करुन एक सक्षम समाज निर्मीतीसाठी जबाबदारीची भुमिका सर्व शिक्षक करत आहेत.म्हणून त्यांचा गौरव,कौतुक केलं पाहिजे.देशाचं भविष्य ज्या मुलांमध्ये आपण पाहतो त्याना शिक्षणाबरोबर सुसंस्काराचे डोस पाजणे ही सुद्धा फार मोठी गरज आहे.देशाच्या विकसित समाज परिवर्तनात शिक्षकाचा सिंहाचा वाटा आहे आणि येणार्या भविष्य काळात आपला देश ज्या भयानक काळाकडे निघाला आहे त्यातून वाचण्यासाठी फक्त शिक्षकच योगदान देऊ शकतात व देश वाचवू शकतात.
प्रतिकूल पारिवारिक परिस्थितीत व प्रतिकूल मानसिक परिस्थितीतून मार्ग काढत कष्ट करून झगडणारे यशाला गवसणी घालण्यासाठी आपल्या पायाशी लोळण घालण्यास भाग पाडणारे डॉ. औदुंबर दत्तात्रय चव्हाण यांनी रसायनशास्त्र विषयावर संशोधन प्रबंध करुन Ph.D.पूर्ण केली.अशक्य काहीच नाही हे डॉ. चव्हाण यांनी आपल्या जिद्द ,चिकाटी व कष्टाने दाखवून दिले आहे.या त्रिमुर्तीचे अभिनंदन करुन आभाळभर शुभेच्छा दिल्या.
तद्नंतर ग्रा.प.चे मा.उपसरपंच धनंजय कलागते यांनी आपले मनोगत व्यक्त करुन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.सोमनाथ मोरे,ग्रा.प.चे मा.सरपंच श्रीमंत शिंदे,मा.ग्रा.सदस्य नवनाथ भुईटे,लक्ष्मण सुरवसे,हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन झांबरे सर,कॉलेजचे प्रा.संजय चव्हाण ,विकास सोसा.चे मा.चेअरमन दिनकर झांबरे,सत्यवान केंजळे,विट्ठल केंजळे,गोरख वाघमारे,शंकर कटके ,बाळू लोखंडे,सुनिल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.