विशेष लेख
दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने...
"महात्मा गांधीजींनी खरा भारत तुम्हाला पाहायचा असेल तर तो खेड्यात पहा..... "खेड्याकडे चला"हा संदेश दिला. महात्मा गांधीजींची स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी गावातील नागरिक एकत्र येऊन गावचा कायापालट घडवतात.. हीच अनुभूती स्वच्छ सुंदर चिंचणी येथे दिसून आली...
पंढरपूर पासून अवघ्या 22 km. अंतरावर निसर्गरम्य परिसरात अवघ्या साडेचारशे लोकवस्तीचे हे गाव.... कोणतीही संकल्पना प्रत्यक्षात आणावयाची असेल तर विचार महत्त्वाचा ठरतो... आपल्या गावाचा कायापालट करावा मुळातच ही संकल्पना तेथील लोकांमध्ये निर्माण होऊन... ती प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेले प्रयत्न यातून त्यांच्या एकात्मतेचे दर्शन घडते.... 🌿🌲🌵🪴💧निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे छोटसं गाव.. हिरव्यागार झाडांनी कुशीत घेतल्याचा भास होतो.....
अवघ्या दोन-तीन महिन्यापूर्वीच महाराष्ट्रभर पोहोचलेलं स्वच्छ सुंदर आदर्श गाव ..... ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.... तेथील परिसर, वातावरण मनाला प्रफुल्लित करणारे आहे....
शाळेचा व गेस्ट हाउस चा परिसर नेत्र सुख देणारा ठरला... जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अद्यावत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त,, बोलक्या भिंती, नीटनेटकेपणा, नियोजन, पारावरची शाळा, रचनावादी दृष्टिकोनातून दिले जाणारे शिक्षण... .. मनाला प्रफुल्लित करणारे होते.... आल्हाद देणारे ठरले.... गावकरी, शिक्षक यांचे मनस्वी अभिनंदन...💐💐
विचारांच्या कक्षा या अनुभूतीने विस्तारित झाल्या..... माझ्या अनुभवाचा हा छोटासा प्रवास , छोटासा टप्पा, मनाच्या आणि हृदयाच्या कप्प्यात चिरंतन स्थापित झाला..... सोबतीला माझा विद्यार्थी वर्ग आहेच.......
🌿मनाच्या गाभाऱ्यातून 🌿
प्रा. सविता दुधभाते पंढरपूर.