स्वतः कॅन्सर मुक्त होऊन गेल्या वीस वर्षापासून कॅन्सरग्रस्त रुग्णांना समुपदेशन व मार्गदर्शन करीत आहेत पंढरपूर येथील महिला रंजना प्रकाश अष्टीकर!
स्वतः कॅन्सरवर मात करून रंजना अष्टीकर गप्प बसल्या नाहीत तर समाजामध्ये जिथे जिथे कॅन्सरग्रस्त पेशंट असतील त्या त्या ठिकाणी जाऊन स्वतः त्या रुग्णाला ते समुपदेशन करतात व मार्गदर्शन करतात. डॉक्टरांनी रंजना यांचा आयुष्य फक्त सहा महिन्याचं सांगितलेलं होतं . त्याने ठरवलले होते की आयुष्यातील प्रत्येक क्षण आपणच जगायचा . स्वतःच्या इच्छाशक्तीच्या व औषधोपचाराच्या बळावर त्यांनी कॅन्सरवर मात केली आणि ठरवलं इथून पुढचं बोनस आयुष्य आपण समाजासाठी द्यायचं . त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना समुपदेशन करण्याचा व विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या त्यांनी प्रारंभ केला.
लहानपणापासून समाजकार्याची आवड असणाऱ्या रंजना यांनी वृद्धाश्रम ,अपंग शाळा, महिला मंडळ , संमती जैन महिला मंडळ यासारख्या विविध संस्थेमध्ये ही अतिशय चांगले काम करत आहेत. आपण स्वतः आनंदी राहण्याबरोबरच इतरांना जर आनंदी केलं तर त्याच्यासारखं जीवन दुसरं कोणतच नाही , हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळल आहे. आज त्या पंढरपूरमध्ये वयाच्या 65 त ही एकटेच राहतात. त्यांची मुले पुण्यात इंजिनियर असून ती सुस्थितीत आहेत .
कॅन्सरग्रस्त रुग्ण माहित झाल्यानंतर रंजनाताई स्वतःच्या खर्चाने त्याच्या घरी, त्याच्या गावी त्या जातात . त्याला औषधोपचाराबद्दल मार्गदर्शन करतात .त्याच्याशी जिव्हाळ्याचे नातेसंबंध निर्माण करतात. त्याच्या मनामध्ये जगण्याविषयी नवीन उमेद निर्माण करतात . त्याच्या कुटुंबाशी चर्चा करून रुग्णांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, त्याला आधार कसा द्यायचा यासंदर्भातलं मार्गदर्शन करतात. रुग्णाच्या मनामध्ये प्रेम निर्माण करतात जेणेकरून औषधोपचाराबरोबरच जगण्याची इच्छा आणि त्याची इच्छाशक्ती प्रबळ होऊन त्याच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते. कॅन्सर ग्रस्त रुग्णाच्या कुटुंबीयांना ते एक मोठा मायेचा आधार वाटतात आणि रुग्णही अतिशय आतुरतेने प्रेमाने त्यांचे वाट बघत असतात.
रंजनाताई ह्या जैन धर्माचे स्वाध्याया विषयी ऑनलाईन आणि ऑफलाइन मार्गदर्शन करतात. पुढचा श्वास आपला नसल्याने, स्वतःच्या अंतिम श्वासाबरोबर या समाजासाठी काम करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केलेल आहे. महिलांनी स्वतः समभाव अंगीकारक स्वतःच्या कुटुंबीयांबरोबरच समाजाचा उद्धार करावा असे त्यांना वाटते . त्याचबरोबर महिलांनी नातेसंबंध टिकून ठेवण्याचा प्रयत्न करावा, सोशल मीडियाच्या कृत्रिम जगातून बाहेर पडत त्यांनी आपल्या स्वतःसाठी कुटुंबासाठी व समाजासाठी सेवाभाव वृत्त बाळगावे असे त्यांना वाटते.
आज सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात त्या काम करत असल्यामुळेच वयाच्या 65 त ही त्यांना कोणत्याही प्रकारचा औषध उपचाराचा खर्च नाही. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे ते म्हणतात इंद्रियांना नाजूक ठेवायचं नाही त्यांना गुंजारायचं नाही त्यांची तीव्रता जाणवू द्यायची नाही .त्यामुळे त्यांच्याकडे साधी कामवालीही बाई नाही ते स्वतःचं काम स्वतः करतात.
स्वतः कॅन्सर मुक्त होऊन गेली 20 वर्ष सतत कॅन्सरग्रस्त रुग्णना समुपदेशन व समाजातील महिलांसाठी , विद्यार्थ्यांसाठी करत असलेले रंजना अष्टीकर यांचे हे काम नक्कीच नवदुर्गचे रुप असल्याचे जाणवते.
साभार - प्रशांत वाघमारे