पंढरपूर प्रतिनिधी
नवरात्र उत्सवात देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी मागील कित्येक वर्षापासून विविध ठिकाणाहून ज्योत आणण्याची प्रथा आहे.
मागील काही वर्षांमध्ये देवीची ज्योत आणायला जाताना किंवा परत येताना भावनेच्या आणि उत्साहाच्या भरामध्ये अपघात होऊन दुर्घटना घडलेल्या आहेत, कित्येक वेळा जीव देखील गमावावा लागलेला आहे.
तरी सर्व देवीच्या भक्तांना आवाहन करण्यात येते की, ज्योत आणण्यास जाताना आणि येताना . . . .
*१.* अनावश्यक उत्साह दाखवू नये.
*२.* कोणताही स्टंट करू नये.
*३.* ज्योत घेऊन येताना रस्त्याच्या डाव्या बाजूने धावावे.
*४.* मोटरसायकलवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती (ट्रिपल सीट) न बसता केवळ दोनच व्यक्ती बसणे.
*५.* चार चाकी वाहन असेल तर क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती बसू नये.
*६.* चार चाकी वाहनाच्या टपावर धोकादायक स्थितीत बसू नये.
*७.* ज्योत दरम्यान मद्यप्राशन करू नये.
*८.* धावत्या वाहनावर लाऊड स्पीकर, DJ लावु नये.
*९.* थकवा आल्यानंतर रस्त्यावरच आडवे झोपून आराम करू नये.
*धनंजय अ. जाधव.*
पोलीस निरीक्षक,
पो. ठाणे पंढरपुर ग्रा.
9011581111
9422581111
9923581111
9960581111