अकलूज प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पाणीवच्या श्रीराम कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांचे पाटीलवस्ती बागेचीवाडी येथे स्वागत करण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत
ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत
पाटीलवस्ती-बागेचीवाडी (तालुका माळशिरस) येथे चार महिन्यांच्या कालावधीत शेती विषयक विविध उपक्रम राबविणार आहेत. यामध्ये माती परीक्षण, विविध पिके त्यावरील विविध रोगांचा प्रादुर्भाव, त्यावर प्रतिबंधक उपाय, पिकांच्या उत्पादन वाढीसाठी च्या उपायोजना, खते, मेहनत मशागत, पाणी इत्यादीं बाबत प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी गणेश राजेंद्र थोरवे , सुशांत संपत धायगुडे , विश्वजित ज्ञानेश्वर अस्वले , विराज अनिल मुळीक , संग्राम दत्तात्रय वाबळे, विशाल बाळू बोराटे या कृषीदूतांचे पथक सज्ज झाले आहे. त्यांच्या स्वागत प्रसंगी सरपंच संगीता अवघडे , उपसरपंच तुषार तोरणे , ग्रामसेवक आलमगीर शेख , यांचेसह शेतकरी उपस्थित होते.
श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव ॲड. अभिषेक पाटील, सहसचिव करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी भाऊ वनवे, प्राचार्य डॉ. हरि हाके, प्रोग्राम ऑफिसर डॉ. जबिन शेख इत्यादींचे आम्हाला मार्गदर्शन लाभत असल्याचे कृषीदूतांनी सांगितले.