ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषी दूतांतर्फे प्रशिक्षणास प्रारंभ
अकलूज प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय पाणी येथील कृषी दुतांनी चौंडेश्वरवाडी (तालुका माळशिरस) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणास प्रारंभ केला. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते. चार महिन्यांच्या कालावधीत कृषी प्रयोग, मार्गदर्शन, प्रशिक्षण इत्यादीं बरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून कृषी दूत पर्यावरणाबाबत जनजागृती करणार आहेत.
शुभम गुरव, प्रणव अनंतपुरे, अश्लेष गवळी,दादासाहेब चव्हाण, सौरभ भोसले, अक्षय शिंदे या कृषी दुतांचे चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने स्वागत करण्यात आले.
श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव ऍड अभिषेक पाटील, सहसचिव करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी भाऊ वनवे, प्राचार्य डॉ. हरि हाके प्रोग्राम ऑफिसर डॉ. जबिन शेख इत्यादींचे या कृषी दूतांना मार्गदर्शन लाभत आहे.