स्त्री ही क्षणकाळाची पत्नी व अनंत काळाची माता आहे.तिला आई,बहीण,मुलगी,पत्नी,मैत्रीण,मावशी,आजी इत्यादी अनेक नाती हळुवारी जोपासावी लागतात.स्त्री ही सृष्टीचे जीवन चक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते आहे. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही.सासर व माहेरच्या दोन्ही घरांना नकळतपणे जोडते.स्त्री आपले मुल संस्कारशील ,अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते.मुल पोटात वाढवण्यापासूनते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्या पर्यंत जबाबदारी स्त्री विनातक्रार पार पडते त्यामुळे साने गुरुजी व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक महान पुरुष घडले.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे ढाल बनते.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या सारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले.स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही तर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यासारख्या अनेक स्त्रीया मायभूमीच्या रक्षणासाठी रणरागिणी झाल्या सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या.त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले.
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे गावच्या सरपंचपदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ति आघाडीवर आहे.अनेक स्त्रीयांनी आपल्या क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केले आहे.
आज स्त्रीचा गौरव केला जातो पण तरीदेखील महिलांच्या समोर अनेक समस्या आवासून आहेत. स्त्री भ्रूणहत्या,लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा,जुन्या चालीरीती इ.समस्या पदोपदी महिलांना भेडसावतात.त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रीयांचे कार्यक्षेत्र विस्तारेल.
महिलानो,आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःपासून बदल करा.कारण पुढची पिढी कशी घडवायची हे तुमच्याच हातात आहे.तुम्ही अखंड प्रेमाचे व प्रेरणेचा स्रोत आहात.स्वतः खंभीर रहा.जीवनात येणाऱ्या संकटाचा जिद्दीने सामना करा.कधीही वाईट गोष्टींचा संग धरू नका;कारण जगण्यासाठी नव्हे तर या पृथ्वीतलावर जन्म घेण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतो.स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती,माणूस,म्हणून बनून दाखवा.आपले वाचन ,लेखन,इ.छद जोपासून नेहमी आनंदी रहा.कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटावा.आत्मनिर्भर बना.ईश्वराने दिलेला सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातल बळ कमी होवू देवू नका.थोर स्त्रीयांची विचार, चरित्र सदैव स्मरणात ठेवा.
"नारी तू घे अशी उंच भरारी
फिरून पाहू नकोस माघारी"
हे घोषवाक्यं घेऊन आणि महाराजांच्या आशीर्वादाने समाजातील महिलांनाच्या मनातील विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ असावे, यासाठी स्वराज्य रणरागिणी महिला संस्था याची स्थापना करण्यात आली. महिलावर्गासाठी विविध उपक्रम मदतकार्य अशे अनेक कार्यक्रम घेतले जातात. सांस्कृतिक, सामाजिक कार्याच्या आयोजनातून महिलांच्या विकासाबरोबरच सामाजिक विकासासाठी महिला प्रयत्नशील आहेत. समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून आपल्या कार्यातून समाजाचे कल्याण व्हावे, यासाठी या महिला संस्थेतील महिला प्रयत्नशील असतात.
अनेक महिलांमध्ये विविध कलागुण असतात. परंतु, हे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ प्रत्येकीलाच मिळते, असे नाही. त्यामुळे त्यांना व्यासपीठ स्वराज्य रणरागिणी महिला संस्था उपलब्ध करुन देत असते. विविध सांस्कृतिक पारंपरिक गुणदर्शन महिला या व्यासपीठावर सादर करतात. तसेच शिवजयंती, जन्माष्टमी ,वार्षिक सहल भजन,महिलादिन असे कार्यक्रम, स्पर्धाही मंडळ आयोजित करत असते. निराधार महिलांसाठी विधवा पेन्शन , निराधार किंवा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची जवाबदारी , महिलांच्या समस्या अश्या अनेक कार्य केले जाते . महाराजांचे विचार आणि अचारांवर संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुप्रिया संदीप आचरेकर यांनी या संस्थेची स्थापना स्त्री सक्षमीकरण, स्त्रीयांसाठी रोजगार निर्मिती, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात मंडळाची वाटचाली साठी केली. संस्थेच्या स्थापनेपूर्वीच स्त्रियांना रोजगार देऊन, परिसरातील आश्रमशाळांना भेट देऊन मंडळाने अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सुरू केलेले आहेत. या संस्थेचे पुढील उद्दिष्ट हे सक्षम बचत गट तयार करून त्याद्वारे महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी करणे हाच असेल . ही अशी संस्था आम्हा टिटवाळाकराना लाभली आहे हेच आमचे भाग्य आम्ही समजतो. अश म्हणतात की स्त्री फक्तं घरचं सांभाळू शकते तिला बाहेरच्या जगात वावरता येत नाही किंवा सामना करन जमत नाही.या सगळ्या टीकाना सुप्रिया ताई या अपवाद ठरल्या आहेत.एक स्त्री घर आणि समाज उत्तम रित्या सांभाळू शकते याच उधारण आहात .आम्हा सर्वांसाठी एक उसुफिर्त आदर्श. तुम्ही आहात .अशे एक नाही अनेक कार्य तुम्ही करत रहा आणि त्यात शक्य असेल तेव्हा नेहमीच तुम्हाला माझी साथ असेल. स्वराज्य रणरागिणी महिला संस्था ही केवळ एक संस्था नसून एक महिलांचं वेगेळ स्वतःच विश्व आहे जिथे सगळेजण आपल सुख दुःख विसरून समाजकार्य करतात आणि कधी तरी स्वतःसाठी जगतात हेच या संस्थेच वैशिष्ट्य आहे.
- सलोनी दरेकर ✍️