मुंबई - गणेश हिरवे
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज, मुंबई या संस्थेची स्थापना ८ आॕक्टोबर १९६२ साली मुंबई येथे झाली. २०२२ हे वर्ष संस्थेचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. हीरक महोत्सवी कार्यक्रमा अंतर्गत संस्थेने आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा (G.K.Quiz Competition) रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी रत्नसिंधू सभागृह मेघवाडी, जोगेश्वरी पूर्व येथे आयोजित केली होती. क्वीझ मास्टर प्रसाद सावंत यांनी ही स्पर्धा घेतली. जोगेश्वरी अंधेरी विभागातील २३ शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुरजबा विद्या मंदिर , जोगेश्वरी (कु. चैतन्य शेणाॕय व अमेय सोहोनी) या टीमने पटकावले. गुरूनानक मिशन हायस्कूल ,अंधेरी व्दितीय क्रमांक (कु. समर्थ पडले व सुरज सोनार) तर सेंट डाॕमनिक हायस्कूल,अंधेरी व होली फॕमिली हायस्कूल अंधेरी यांना मिळाले. संस्थेचे कार्यकारणी सदस्य सीए संतोष घाग व संस्थेचे उपकार्याध्यक्ष सहदेव सावंत यांच्या हस्ते विजेत्या टीमला ट्राॕफी, सन्मान पत्र व रोख पारितोषिक देण्यात आली.
स्पर्धेला संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर, सरचिटणीस जितेंद्र पवार, कार्याध्यक्ष मोतीराम विश्वासराव, प्रशासकीय अधिकारी अशोक परब, सुबोध बने, बाल विकास विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सिध्दार्थ इंगळे, पर्यवेक्षक जगदिश सूर्यवंशी, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका डिंपल दुसाणे व शबनम हुल्लर, शिक्षक प्रशांत मोरे, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते. सुत्रसंचलन शिक्षक विलास रहाटे यांनी केले.