*भाळवणीत आज निरा कालव्याच्या पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन*
भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील निरा कालव्यातून पाणी न दिल्यामुळे शाखा क्रमांक एक व दोन च्या शेतक-यांनी येथील बसस्थानकासमोर शनिवारी सकाळी रस्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी,या कालव्यावर आधारित असलेली सर्व गावे शासनाने दुष्काळी गावे जाहिर केलेली आहेत.या भागातील विहीरी,बोअर,ओढे आटले आहेत.जनावरांना व माणसांना पिण्यासाठी पाणी नाही.पाण्याशिवाय पिके जळून गेली आहेत.उत्पन्नाचे काही साधन राहिलेलेच नाही.तरी सुध्दा पाटबंधारे विभागाने शेतकरी वर्गाकडून सक्तीची पाणीपट्टी वसूल केली.त्यानंतरच पाणी मागणी अर्ज जमा करून घेतले.यावेळी सुध्दा शेतक-यांना उपोषणास बसावे लागले.
त्यानंतर उन्हाळी हंगाम पाणी आज मिळेल,उदया मिळेल म्हणून शेतकरी वाट पाहू लागले.त्यावेळी संबधित खात्यात चौकशी केली असता,तुम्ही वसूल न दिल्यामुळे पाणी सोडणार नसल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले.यावेळी अधिकारी मनमानी करीत आहेत.म्हणूनच शेतक-यांनी रस्ता रोको आंदोलनांचा मार्ग स्वीकारला.
या पाण्याबाबत नेहमीच शेतकरी व अधिकारी यांच्यात वाद निर्माण होतात.यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे.अशी चर्चा शेतकरी वर्गातून केली जात आहे.
चौकट - इतर शाखांची थकबाकी असतानाही पाणी सोडले तसेच या शाखांनासुध्दा पाणी सोडलेच पाहिजे.पाणी न सोडल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार आहे.तसेच कांही नुकसान झाल्यास लोकप्रतिनिधी व संबधित अधिका-यांना जबाबदार धरण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.
प्रशांत माळवदे,पत्रकार