कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण,जनजागृतीचे उपक्रम
तांदुळवाडी प्रतिनिधी तेज न्यूज
"तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दुतांकडून व तांदुळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व प्रतिकात्मक वृक्ष देऊन सर्व मान्यवर व शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले. गावामध्ये विद्यार्थ्यांनी वातावरण बदल त्याचा शेतीवर होणारा परिणाम यामध्ये असणारे झाडांचे महत्त्व याबद्दल समाज प्रबोधन केले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि हनुमान प्राथमिक विद्यालय तांदुळवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांकडून कृषी मित्रांच्या सहकार्याने गावामध्ये वृक्षदिंडी काढत विद्यार्थ्यांनी "झाडे लावा झाडे जगवा", "वृक्षारोपण करूया आणि निसर्ग वाचवुया " अशा घोषणा देण्यात आल्या व या साठी शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावातील सर्व महाविद्यालयांमध्ये कृषी मित्रांकडून वृक्षारोपण करण्यात आले .यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी व उपस्थित मान्यवरांनी मिळून शंभरहून अधिक औषधी झाडे, छाया दायक झाडांचे रोपण केले यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, वन विभाग यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील ,रत्नाई कृषी महाविद्यालयाचे अकलूज प्राचार्य .आर .जी . नलावडे ,प्रा. एस. एम. एकतपुरे(कार्यक्रम समन्वयक ),प्रा. एम .एम. चंदनकर( कार्यक्रम अधिकारी), प्रा.डी.एस.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषीदूत अविराज पवार, श्रीधर मारकड, सुयश बागल, संदेश मोरे, अनिकेत चव्हाण, महेश गंगथडे, प्रथमेश चव्हाण, विवेक थोरात यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले .