भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषीदूत धनेश कणमुसे, आकाश पाटील, दयानंद बिदरी, आनंद जमादार, प्रशांत जाधव, विनायक कोटगी, किरण माळी, व करण लोखंडे यांनी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा भाळवणी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी भाळवणी गावाचे सरपंच रणजीत नानासो जाधव, उपसरपंच नितीन पांडुरंग शिंदे, एस एन शिंदे (मुख्याध्यापक जि प प्रा शाळा ( मुली) भाळवणी), मा. श्री पी बी गायकवाड(मुख्याध्यापक जि प प्रा शाळा (मुले) भाळवणी) ,शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत जि प प्रा शाळा भाळवणी च्या परिसरात अशोका व रॉयल पाम चे रोप लावण्यात आले. उपसरपंच नितीन पांडुरंग शिंदे यांनी शेती आणि कृषी चे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज चे प्राचार्य आर जी नलावडे,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस एम एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम एम चंदनकर आणि प्रा एच वि कल्याणी यांचे मार्गदर्शन लाभले.