सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज सोलापुरातून बहुप्रतिक्षित असलेली नागरी विमान सेवा सुरू होत आहे व त्यामुळे सोलापूरच्या प्रगतीची दारे पुन्हा उघडल्या गेली आहेत. आमच्या सोलापूर विचार मंचने गेली 5 वर्ष उभा केलेल्या लढ्याला आलेले हे अभूतपूर्व यश आहे.
यासाठी आम्हाला अनधिकृत चिमणी हटवण्यासाठी अतिशय खडतर न्यायालयीन व प्रशासकीय लढाई लढावी लागली व त्यात कोणत्याही पक्षातील लोकांनी अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत केली नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे.
परंतु आपल्या हक्कासाठी सर्वसामान्य नागरिकांनी एक चळवळ उभा करून विमानसेवा सुरू केली ही भारतातील एक अभूतपूर्व व सोलापूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदली जाणार जाणारी गोष्ट ठरली आहे. सोलापूर साठी आम्ही हे अतिशय खडतर काम करू शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
या अभूतपूर्व लढया मध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाची मदत केली व ज्या मीडियाने साथ दिली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
शेवटी बुद्धी ,चिकाटी व प्रामाणिक प्रयत्नांसमोर सर्व राजकीय व प्रशासकीय अनास्थेला झुकावे लागले हे एक जगातील अनोखे व काही शिकण्यासारखे उदाहरण सोलापूर विचार मंचने व सोलापूरने जगाला दाखवून दिलेले आहे. याचबरोबर या विमानसेवेचे काहीही न करता फुकट श्रेय लाटणाऱ्यांना आज निसर्गाने उत्तर देऊन शेवटी सत्याचा विजय कसा होत असतो हे सुद्धा दाखवून दिले आहे. परंतु या क्षणी सर्व पत्रकार व मीडिया सोलापूरच्या विमानसेवेच्या शिल्पकारांना विसरले ही अतिशय दुःखद गोष्ट आहे.
डॉ. संदीप आडके. अस्थिरोग तज्ञ,
सोलापूर विचार मंच सदस्य, सोलापूर.