सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर शहरातील सात रस्ता चौकातील लाखो रुपये खर्च करून अनेकदा नूतनीकरण केलेल्या आयलँड वर चक्क मोकाट सुटलेली गाढवं गवतावर येथेच्छ ताव मारताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे हा सोलापुरातीलच नव्हे तर कदाचित भारतातील असा चौक आहे की जिथे सात रस्ते एकत्र येतात. या चौकातच सरकारी विश्राम ग्रह आहे.
हीच परिस्थिती सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी दिसत आहे. ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले व ज्या लोकांना सरकारने कामे करण्यासाठी गलेलठ्ठ पगार देऊन पोसले आहे त्या सर्वांचे सोलापूरच्या समस्यांकडे असेच दुर्लक्ष झालेले आहे.
सोलापूर शहरातील संबंधित अधिकारी यांनी यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून शहराच्या विकास कार्यात सहभागी होऊन मदत करावी.
सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके