प्रयागराज प्रतिनिधी तेज न्यूज
चारधाम यात्रा करण्यासाठी महाराष्ट्रातून निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. चारधामला दर्शनासाठी पोहोचण्याआधीच नियतीनं घात केला. रस्त्यात काळानं गाठलं आणि नको तेच घडलं. भररस्त्यात ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस थेट अलकनंदा नदीत कोसळली. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ महामार्गावर गुरुवारी एक भीषण अपघात झाला.
अपघात नेमका कसा झाला ?
केदारनाथहून बद्रीनाथला जाणाऱ्या टेम्पोने खासगी बसला धडक दिली. या धडकेमुळे नियंत्रण सुटल्याने बस अलकनंदा नदीत कोसळली. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिला, दोन मुले आणि तीन पुरुषांचा समावेश आहे, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 10 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे, ज्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. बसमध्ये चालकासह एकूण २० जण होते. ७ प्रवासी गुजरातचे, २ महाराष्ट्राचे आणि ७ राजस्थानचे होते. चालक हरिद्वारचा रहिवासी होता. याशिवाय दोन जण मध्य प्रदेशचे होते. अपघातात जखमी झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर चालक सुमितने सांगितले की, तो केदारनाथहून बसने बद्रीनाथला जात होता. यादरम्यान एका ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली, ज्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला. त्याने सांगितले की, टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण १९ लोक होते.