देव भावाचा भुकेला आहे तुम्हीं काहीही देऊ नका भक्त भाव अर्पण करा...तो आपोआप धाऊन येणार
वाळूज प्रतिनिधी तेज न्यूज
वाळुंज येथे कै.मारुती नाथा कुंभार यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या श्रवणीय तितक्याच सुश्राव्य नारदीय कीर्तन यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार कीर्तनचंद्रिका रोहिणी ताई माने-परांजपे सांगत होत्या.
सुरुवातीला कै.मारुती नाथा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करत कीर्तनाला सुरुवात झाली.पूर्वरंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रेम सुख देई या सुंदर अभंगावर सुंदर भावपूर्ण निरुपण करीत असताना देव भावाचा भुकेला आहे.तो भक्ताच्या संकटात मागे पुढे उभा राहतो.आपण फक्त परमेश्वराच्या चरणी दृढभाव ठेवला पाहिजे.विठूरायाच्या नाम रंगात रंगले की आलं आयुष्य सुखकर झाल्या शिवाय राहणार नाही.संसार हा दुखमुळ आहे.त्या संसारात नामामृत घेतल तर आपल्या संसाराचही नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.शाश्वत सुख पाहिजे असेल तर आध्यात्माशिवाय पर्याय नाही.जिथ विज्ञान संपत तिथ आध्यात्म सुरू होत.हे माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरी मध्येही सांगितले आहे.उत्तररंगामध्ये देव भावाचा भुकेला कसा असतो यावर संत नामदेव यांच्या चरित्रातील विठूराया नामदेव रायाच्या हातून कसे जेवतात याच सुंदर चरित्र सांगितले .त्यानंतर कै.मारुती नाथा कुंभार यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करत त्यांना आदरांजली वाहिली उपस्थित सर्व भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला साथ ज्ञानेश्वर दुधाणे तर हार्मोनियम साथ वैभव केंगार यांनी दिली.
उपस्थित सर्वांना महाप्रसाद झाला यावेळी वाळूज व पंचक्रोशितील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश कुंभार आणि कुंभार बंधू परिवारातील सर्वांनी अधिक परिश्रम घेतले.