मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज उदय वाघवणकर
खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोकण रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी त्यांना मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ स्टेशन करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत निवेदन दिले.तसेच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत गोरेगाव स्थानकाचा विकास करण्यात यावा.व कोकण रेल्वे बोर्डाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे जेणेकरून केंद्र सरकारच्या रेल्वे संदर्भातील योजनांचा लाभ कोकण रेल्वेला देखील जास्त प्रमाणात मिळेल.