सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशातच भारत आणि पाकिस्तानात युद्धाचे ढग आले आहेत. येत्या 36 तासात युद्धाला सुरुवात होणार असल्याची माहिती अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी दिली आहे.
भारताची रास मकर असून भारताचे ग्रहमान अनुकूल आहे. देशाची साडेसाती 29 मार्च रोजी संपली आहे. शनी तिसऱ्या स्थानी असल्याने मे महिन्यात महत्त्वाचे ग्रह बदलले आहेत, जे भारताला हे ग्रहमान उच्च स्थानी आहेत. तर पाकिस्तानचे ग्रहमान प्रतिकूल आहेत. या मे महिन्यात जगभरात खूप मोठा उत्पात होणार आहे. भारताला मोठा विजय मिळणार आहे. पाकिस्तानची खूप वाईट अवस्था होणार आहे. पाकिस्तानचे ग्रहमान अनुकूल नाही. हा मे महिना खूप महत्वाचा असून यामुळं जागतिक महायुद्ध घडू शकेल असे मत अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तान हे दहशतवाद्याचं आश्रयस्थान
सध्या जगासमोर मोठं आव्हान आहे. पाकिस्तान हे दहशतवाद्याचं आश्रयस्थान आहे. त्या पाकिस्तानातून जगभरात दहशतवादी पसरले आहेत. गेल्या आठवड्यात पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर आपला देश खडबडून जागा झाल्याची माहिती भगरे गुरुजींनी दिली आहे. एकदा पाकिस्तानची खोड मोडली पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे. ग्रहमानानुसार तीन ग्रह बदलत आहेत. गुरु, राहु आणि केतू यामध्ये बदल होत आहेत. त्यामुळंफार मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन्ही देशामध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये हानी होण्याची शक्यता आहे. आपल्या देशासाठी ग्रहमान चांगले आहे. आता जरी युद्ध सुरु केले तर भारताचा विजय निश्चित असल्याचे भगरे गुरुजी म्हणाले.
भारत आणि पाकिस्तानकडे संपूर्ण जगाचे लक्ष
भारत आणि पाकिस्तानकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आपल्या बाजून जसे देश आहेत, तसेच पाकिस्तानच्या बाजूनेही काही देश आहेत. पण सध्या पाकिस्तानची वाईट अवस्था आहेत. त्यामुळं पाकिस्तानला युद्ध परवडणारे नाही. त्यांच्या आणि आपल्या राशीत खूप अंतर आहे. त्यांना ग्रहंमान प्रतिकूल असल्याचे भगरे गुरुजी म्हणाले. त्यामुळं पुढच्या 36 तासात या दोन्ही देशात युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे भगरे गुरुजी म्हणाले.