मायणी प्रतिनिधी तेज न्यूज
मायणी गावातील ट्रॅफिक जाम वरील कायमचा उपाय म्हणून आणि मायणी मुख्यापेठेतील रस्त्याला पर्यायी म्हणून मायणी बायपास रोड ची निर्मिती झाली आहे. परंतु अद्याप हा बायपास रस्ता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
गेले अनेक दिवसांची लोकांची गैरसोय व मायणी उपनगरात जाण्यासाठीही हा रस्ता उपयुक्त बनला आहे. मायणी गावाचा हा प्रश्न सोडवण्यात मायणी पोलीस प्रशासनाचा हात आहे. बायपास निर्मिती करण्यात तत्कालीन अधिकारी श्री दळवी यांची मोठी मदत झाली होती. तसेच माजी आमदार डॉ . दिलीपराव येळगावकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. तत्कालीन मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते याठिकाणी भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु नंतर तांत्रिक बाबींमध्ये हा रस्ता अडकला होता. त्यातून डॉ येळगावकर यांनी मार्ग काढत या रस्त्याची महसूल व पाटबंधारे विभागाकडून परवानगी व ना हरकत परवानगी घेऊन बायपास रस्ता निर्माण करण्याचा मार्ग सुखकर केला. त्याच बरोबर या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी आजचे विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे श्रेय असून यासाठी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी प्रयत्न केले आहेत.
काही दिवसापूर्वी या रस्त्याचे तसेच मायणी प्राथमिक शाळा, व अन्य उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार होता. परंतु , मंत्री महोदयांच्या वेळे आभवी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
परंतू मायणी व परिसरातील मंत्री जयकुमार गोरे व डॉ येळगावकर यांच्या कार्यकर्ते व ग्रामस्थांची यांची त्यांच्याकडे मागणी आहे. लवकरात लवकर या विकास कामांचे उद्घाटन पूर्ण करावे. जेणेकरून फुकट श्रेय घेणाऱ्या विरोधकांना चपराक बसेल.
सध्य स्थितीत या रस्त्याचे काम चांगले दिसत आहे. परंतु नदीचा पुर व यंदाच्या पावसाळ्यात ठेकेदाराकडून कोणत्या पद्धतीचे काम याठिकाणी झाले आहे याचे परीक्षण होणार असून नाहीतर संबंधित ठेकेदार शासनाच्या शिक्षेस पात्र बनणार आहे.