सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
इयत्ता बारावी परीक्षेमध्ये कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले त्यानिमित्ताने कॉलेजच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला सन 2024 -2025 बोर्ड परीक्षेचा निकाल कला व शास्त्र शाखेचा 100 टक्के लागला आहे.
कला शाखेतून कुमार संदेश सदाशिव चोरमुले या विद्यार्थ्यांने 89.33 टक्के गुण मिळवून कॉलेज मध्ये व हातिद केंद्रात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. त्याचबरोबर कुमारी वैशाली बाबासो सरगर हीने 86.83 टक्के गुण मिळवून कॉलेज मध्ये द्वितीय व केंद्रात तृतीय आली आहे तसेच कुमारी सुवर्णा पांडुरंग आलदर हीने 85.67 टक्के गुण मिळविले आहेत ती कॉलेजमध्ये तृतीय व केंद्रात चौथी आली आहे.त्याचबरोबर कुमारी रेणुका सुरेश आलदर हीने 82.33 गुण मिळवून कॉलेज मध्ये चौथा तर केंद्रात पाचवा क्रमांक मिळविला आहे तसेच कुमारी उज्वला जगन्नाथ करांडे या विद्यार्थ्यांनीला 81.00 गुण मिळाले असून ती कॉलेजमध्ये पाचवी तर केंद्रात सहावी आली आहे
त्याचबरोबर शास्त्र शाखेमध्ये गुणानुक्रमे पहिला कुमारी वर्षा बाळू शितोळे (75.83) दुसरा कुमारी ऐश्वर्या पांडुरंग कोळेकर (73.67) तिसरा कुमारी दिपाली सुखदेव मदने(72.67)
तसेच कोमल भगवान बिले,कोमल महादेव कोळेकर, अश्विनी महादेव कोळेकर, तनुजा राजाराम आलदर, संकेत रावसाहेब सरगर, सानिका यशवंत सरगर, प्रियांका ज्ञानेश्वर करांडे, निकीता दत्तात्रय हातेकर, अक्षदा सोन्याबापू वाघमोडे, स्नेहल रामचंद्र कोळेकर, सानिका सिद्धाप्पा कोरडे, इत्यादी विद्यार्थ्यांनी काही विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळवून विषयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे
वरिल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा बांधून गुलाबपुष्प देऊन त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कुमारी वैशाली बाबासो सरगर या विद्यार्थ्यींनीने अर्थशास्त्र या विषयात 98 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला सदर विद्यार्थ्यींनीला मार्गदर्शन करणारे प्रा. अमोल कोरे यांचाही उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल प्राचार्य श्री.श्रीकांत लांडगे सर यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला
विद्यार्थी मनोगतात कुमारी ऐश्वर्या पांडुरंग कोळेकर व कुमार संदेश सदाशिव चोरमुले यांनी कॉलेज बद्दल ऋण व्यक्त केले. तसेच पालकांनी कॉलेज बद्दल आभार व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत प्राचार्य श्री श्रीकांत लांडगे सर म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी आता मागे राहिले नाहीत.
तर राज्यात चमकू लागले आहेत. या यशामध्ये संस्था, शिक्षक,पालक यांचे ही योगदान मोलाचे आहे. आमची संस्था विद्यार्थी हित जोपासते त्यामुळेच आज हे यश आपणास पाहावयास मिळते. तसेच या गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यात उज्ज्वल यश मिळवून स्वताचे,पालकांचे, कॉलेजचे नाव कमवावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्रा. तानाजी सरगर, प्रा. आनंदा आलदर, प्रा. अमोल कोरे, प्रा. अंकुश सरगर, प्रा. मारुती श्रीराम, प्रा. महादेव गायकवाड, प्रा. सुनील माळी, प्रा. कु. शुभांगी गयाळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. आनंदा आलदर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. तानाजी सरगर यांनी केले.