सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
समाजाला महात्मा बसवेश्वराच्या विचाराची गरज डॉक्टर इरेश स्वामी आजच्या समाजाला जगत ज्योती महात्मा बसवेश्वराची विचाराची गरज असून समाज सुधारण्यासाठी महात्मा बसवेश्वराचे शिकवणाचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे डॉ ईरेश स्वामी सर गुरुविद्या प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या जगत ज्योती महात्मा बसवेश्वर बसव मानद पुरस्कार वितरणाप्रसंगी सोलापूर येथील हॉटेल समृद्ध येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरूविद्या प्रतिष्ठानचे श्री सातलिंग शटगार भुषविले होते.स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्षा सौ राजश्री तडकासे यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना डॉक्टर ईरेश स्वामी म्हणाले की आपण साक्षर झालो पण मानव धर्म मानवता विसरत चाललेलो आहोत. या डिजिटल युगामध्ये कौटुंबिक नाती दूर होत चाललेले आहेत स्पर्धात्मक जगामध्ये आपण कितीही मोठे झालो तरी मानव धर्म विसरून चालणार नाही. मातृदेवो भव. पितृ देवो भव. आचार्य देवो भव. हे विसरता कामा नये. बसवण्णानी हिंसा करू नकोस . दुसऱ्याची निंदा करू नकोस चोरी करू नकोस. स्वतःची स्तुती करू नकोस. अशी समाजाला शिकवण दिलेली आहे .
अध्यक्षीय भाषणात सातलिंग शटगार म्हणाले की महात्मा बसवेश्वर आणि बाराव्या शतकात पहिली लोकशाही अनुभव मंडपाच्या माध्यमातून उभी केली. यावेळी शरणांच्या वचन साहित्याची निर्मिती झाली आणि समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना महात्मा बसवेश्वर आणि रुजून त्यावेळी त्यांनी क्रांती केली असे सांगू कर्मकांड अंधश्रद्धेला विरोध केले आणि श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले .
मानद पुरस्काराचे वितरण बसव मानद पुरस्कार प्राप्त डॉ मनोहर मोर(अक्कलकोट) गुरूविद्या बसव रत्न पुरस्कार.श्रीमती वैशाली विलास देशपांडे,गुरुविद्या बसव माता पुरस्कार. सौ अनिता सुंदरलाल मोरे, गुरूविद्या बसव भुषण पुरस्कार.श्री विठ्ठलराव नारायणराव न्हावकर,सौ छबुबाई विठ्ठलराव न्हावकर गुरूविद्या बसव शरण दांपत्य पुरस्कार,श्री चनबसवेश्वर सिद्रामं सोलापुरे.गुरुविद्या बसव भक्त पुरस्कार.श्री शिवानंद हिरेमठ पक्षी मित्र गुरुविद्या बसव श्री पुरस्कार .सौ सुनिता शटगार गुरुविद्या बसव शरणी पुरस्कार.सौ मानसी मोहन वैद्य. मोहन नरसिंह वैद्य.गुरुविद्या बसव शरण दांपत्य.स्वर्गीय पल्लवी प्रफुल्ल दळवी माजी मुख्याध्यापिका संभाजीराव शिंदे प्रशाला बिडी घरकुल सोलापूर मरणोत्तर बसव शरणी पुरस्कार सुनील वाघमोडे, धनश्री सुनील वाघमोडे गुरूविद्या बसव शरण दांपत्य.
या सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे डॉ इरेश स्वामी माजी कुलगुरू सोलापूर विद्यापीठ,यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष बसव उत्सव समिती, तथा सातलिंग शटगार,संस्थापक सोमशेखर भोगडे, उप्पाध्यक्षा राजश्री तडकासे,माजी अध्यक्ष प्रा. प्रभाकर नागणसूरे, सदस्य विजयकुमार भोगडे, नमिता थिटे कार्याध्यक्षा, सल्लागार मोहन भुमकर,यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या कार्यक्रमास जाहागीर शेख, नितीन कुलकर्णी, अंबादास गवळी, डॉ शिवानंद सुगरे आधी उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप स्मुतीचिन्ह, प्रमाणपत्र मोत्यांचे हार,शाल, बुके असे होते.
पुरस्कारास उत्तर देताना मोहन वेद्य, वैशाली देशपांडे, चनबसवेश्वर सोलापुरे, अनिता मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन अध्यक्षाचे आणि प्रतिष्ठानचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.तसेच बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी बसव जयंतीनिमित्त सकाळी ८.३० वाजता कौतम चौक येथे बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.बसंव जयंती सांगता होणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय जामदार,मंजूर शेख, प्रतिक्षा खंडाळकर, शिवलीला भोगडे, नेहा भोगडे, नितीन भोगडे परिश्रम घेतले.
शेवटी आभार मोहन भुमकर केले. सुत्रसंचलन सचिवा श्रीदेवी यळमेली यांनी केले.