के वा सी साठी सारखे बँकांकडून ग्राहकांना बोलाविले जाते.या संदर्भात आर बी आय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी खातेदार आणि ठेवीदार यांना वारंवार बँकेत बोलावू नये अशी माहिती रिझर्व्ह बँक लोकपालाच्या वार्षिक परिषदेत दिल्याची माहिती वाचण्यात आली.
ग्राहकांनी एकदा बँकेकडे कागदपत्रे सादर केल्यानंत्स प्रत्येक दोन तीन वर्षांनी बँका पुन्हा पुन्हा ग्राहकांना के वा सी साठी बोलावतात आणि याचा जास्त त्रास दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांस होतो.एकदा कागदपत्र दिल्यानंतर पुन्हापुन्हा वारंवार तीच तीच कागदपत्रे मागविण्यात काय साध्य बँक करीत आहे. असा प्रश्न खातेदारांच्या मनात येतो.कोणत्याही वित्तीय नियमकांच्या देखरेखीखाली असलेल्या संस्थेकडे कागदपत्रे सादर केल्याने इतराना सामान्य डेटाबेसमधून ती कागदपत्र मिळविणे शक्य होते.काही बँका तर ग्राहकांना के वा सी साठी तगादा लावतात.
रिझर्व्ह बँक जर प्रत्येक वर्षी कागदपत्र मागत असेल तर आर बी आय ने तशी नोटीस किंवा सर्कलर बँकांनी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.पण असे कुठलीच नोटीस बँका लावत नाहीत आणि आर बी आय च्या आम्हला गाईड लाइन्स आहेत असे निव्वळ तोंडी सांगतात हे सर्वस्वी चुकीचे आणि भयानक आहे.ग्राहकांच्या पैशांवर बँका चालतात हे वास्तव आहे.बँकांनी के वा सी साठी खातेदारांना सतावू नये असे जनतेचे म्हणणे आहे.
गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व